नांदेड| चार राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाने मुसंडी भरली असून देशातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड येथील राज्यात भाजपाचे सरकार होणार आहे. त्यामुळे या तिन्ही राज्यात भाजपाचा विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वास आणि लोकशाहीला बळकटी करणारा असल्याचे मत खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले.

छत्तीसगड ,राजस्थान ,मध्य प्रदेश आणि तेलंगणा या चार राज्यातील विधानसभेसाठी नुकतेच मतदान पार पाडले होते . या मतदानाची आज दिनांक 3 डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडली. अनेक एक्झिट पोलचा अंदाज चुकवत भारतीय जनता पार्टीने देशातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यात मुसंडी मारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा जनतेने विश्वास टाकला असून तिन्ही राज्यातील भाजपाचा विजय हा ऐतिहासिक ठरला आहे .

त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकशाहीला बळकट करणारा हा विजय असून, या निकालाने भारतीय जनता पार्टी , लोकशाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सार्थ विश्वास दर्शवला आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होईल आणि तेही ऐतिहासिकरित्या स्थापन होईल असा विश्वासही खा. चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे. तिन्ही राज्यातील नवनिर्वाचित सर्व आमदारांनाही भविष्यासाठी खा. चिखलीकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version