श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| गेल्या पंधरवड्या पासून रिमझिम पाऊस सुरू आहे. या संतधर पावसाने माहूर तालुक्यातील मौजे कुपटी ते दहेगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावरील नळकांडी बुटक्या फुलांवरून पाणी वाहत असल्याने वारंवार मार्ग बंद पडतो आहे. पुलाची उंची वाढविली नसल्याने पंधरा दिवसात तीन ते चार वेळा या गावांचा संपर्क तुटत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घेत या नळकांडी बुटक्या फुलाची उंची वाढवावी. अशी मागणी निवेदनाद्वारे दहेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते परसराम पारडे यांनी केली आहे.

माहूर तालुक्यातील मौजे कुपटी पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या दहेगाव आणि गावा लगत गावामध्ये जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाची उंची कमी असल्यामुळे थोडा जास्त पाऊस झालातरी या नळीकांडी बुटक्या पुलावरून पुराचे पाणी जात आहे. हा पुर उतरण्याकरिता तासांन तास वाट बघावी लागत आहे. विशेष म्हणजे हे गाव साकुर दहेगाव शिरंजनी असे तीन गावाची गट ग्रामपंचायत असल्यामुळे साकुर वरून दहेगावला जाण्याकरिता एकच मार्ग आहे.

हाच एकमेव मुख्य रस्ता असल्याने दरवर्षी या पुलावरून जास्त पाऊस झाला की पुराचे पाणी जात आहे. याकरिता दहेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते परसराम पारडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग माहुर यांनी पुलाची उंची वाढवून दोन्ही बाजूचे रस्ते मजबूत करावे असे निवेदन दि 9 रोजी लेखी दिले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version