हिमायतनगर, अनिल मादसवार। हिमायतनगर शहर व तालुका परिसरात बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन जोरदार पाऊस झाला. तर काही भागात गारा देखील पाडल्या. तर वादळी वाऱ्याने सिरंजनी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील महाकाय वृक्ष तुटून पडल्याने 2 तासापासून रस्ता बंद झाला होता. तसेच महावितरण कंपनीचे विजेचे पोल जमिनीकडे झुकलेल्या अवस्थेत असल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता.

गेल्या आठ पंधरा दिवसापासून नांदेड जिल्ह्यासह हिमायतनगर तालुका परिसरात उष्णतेने उच्चांक काढला असून उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. कालच प्रशासनाने नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज अचानक वातावरणात बदल होऊन बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांसह शहरातील आठवडी बाजारासाठी आलेल्या नागरिकांची एकचं धावपळ उडाली होती. तर शेतीत वादळामुळे हळदीसह व वैरनाचं मोठं नुकसान झालं आहे. आजच्या वादळी पावसाने 43अंश सेल्सियसच्या उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे..

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडाला लागलेली आंबे गळून पडल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे

तर आंब्याच्या झाडाला लगडलेली आंबे, टरबूज, चिकूसह ईतर फळबागांचे व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच शेतात साठवून ठेवलेलं इंधन परहट्या व वैरण उडून गेली, तर शेतीत असलेल्या हळद, तीळ, भुईमूग, सूर्यफूल,उन्हाळी ज्वारी, आदी पिकांचे नुकसान झाले तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. तर हिमायतनगर तालुक्यातील सरंजनी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील महाकाय वृक्ष तुटून पडल्याने तसेच वीज वाहिण्याचे खांबही वाकल्यामुळे दोन ते तीन तास पासून रस्ता बंद पडला होता. गावाकडे ये जा करताना नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करून रस्ता पार करावा लागला आहे. यासह काही ठिकाणी झाडे जमीनदोस्त झाली असून, ग्रामीण भागातील काही गावातील नागरिकांच्या घरांसह झोपड्या वरील टिनपत्रे उडून गेल्याने संसारउपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले आहे. तर ग्रामीण भागातील वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे.

गेल्या 15 दिवसापासून वातावरणात उकाडा वाढला आहे, अंगाची लाही लाही होत असून, दोन दिवसांपासून वातावरण बदल होऊन कधी ढगाळ तर कधी कडकडीत ऊन यामुळे अचानक वादळी वारे येऊ लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी नागरिक व शेतातील आखाडयावरील टिनपत्रे उडून गेली, आज झालेल्या वादळी वारे, विजांचा कडकडाटात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना हैराण करून सोडले होते.

मात्र हिमायतनगर येथे बुधवारी आज आठवडी बाजार असल्यामुळे बाजार करण्यासाठी आलेले नागरिक व व्यापारी वर्गाचे वादळी वारे व पावसामुळे नुकसान झाले असून, शेतकरी, व्यापारी व बाजारात आलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडाली असल्याचे पहावयास मिळाले आहे. एकूणच यंदा शेतकऱ्यांना भर उन्हाळ्यातही अवकाळी पावसाचा सामना करत नुकसान सहन करावे लागत आहे, याचे पंचनामे होऊन भरपाई मिळावी अशी माफक अपेक्षा शेतकरी वर्गातून केली जात आहे.

आठवडी बाजारात पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने भाजीपाला विक्रेत्यांना मोठया नुकसानीचा सामना करावा लागला असून, वाहत पाण्यात भाजीपाला वाहून गेला आहे, यामुळं नगरपंचायत प्रशासनाच्या नाली स्वच्छतेचे धिंडवडे निघाले असून, नाल्यात केरकचरा जौसेथे असल्याने नालीतील पाणी रस्त्यावर वाहून नगरपंचायत कार्यालय परिसरात पावसामुळे तळे साचल्याने चित्र दिसून आले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version