नांदेड। मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून सरसकट कुणबी दाखले देण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी आंतरवाली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना या छोट्याशा गावात मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेला लढा आता निर्णायक टप्प्याकडे आलेला आहे .

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसाचा अवधी दिला होता,14 ऑक्टोंबर रोजी 30 दिवस संपणार आहेत आणि 24 ऑक्टोबर रोजी सरकारने मागून घेतलेला वेळ हा पूर्णतः संपत असुन तत्पूर्वी दहा दिवस पहिलेच सरकारला आपण मागून घेतलेल्या वेळ संपत असल्याची जाणीव करून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली त्यांच्या कमिटीनी व अंतरवाली सराटी गावकऱ्यांनी प्रचंड मोठ्या सभेचे आयोजन केले असुन सदरील महा मेळाव्यासाठी जवळपास तीनशे एकर जमीन ही पार्किंग आणि सभेसाठी तयार करण्यात आली असुन याठिकाणी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून समाज बांधव येत आहेत.

सदरील सभेच्या पुर्वी मनोज जरांगे पाटील हे राज्यव्यापी दौरा काढत समाजबांधवांचे आशीर्वाद घेण्यासाठी,भेटी गाठी घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचले आणि प्रचंड यशस्वी दौरे करून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांना मराठा आरक्षणविषयी व सध्याच्या सरकारच्या घडामोडीची माहिती देत 14 तारखेच्या महा सभेबद्दल सुद्धा आवाहन करीत जिल्ह्या जिल्ह्यात सभा गाजवल्या, आता अवघ्या तीन दिवसावर ती ऐतिहासिक सभा येऊन ठेपलेली आहे.

दि.14 ऑक्टोंबर रोजी आयोजित केलेल्या महा सभेच्या पूर्व नियोजनासाठी काल दिनांक 9 ऑक्टोंबर रोजी एक महत्त्वपूर्ण बैठक अंबड चे तहसीलदार श्रीयुत शेळके साहेब व नियोजन समितीच्या गावऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत सभास्थळी पार पडली असून, सदरील बैठकीला नांदेड जिल्ह्यातील श्याम पाटील वडजे यांच्या सह काही समाज बांधव उपस्थित होते.या बैठकीत चर्चा करीत असताना लाखों च्या संख्येने समाज बांधव आंतरवाली सराटी या ठिकाणी महामेळाव्यासाठी जमणार असा अंदाज बांधण्यात येत असून त्या दृष्टीने आता नियोजन चालू आहे.वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या असुन प्रत्येकाची जबाबदारी ही वाटून देण्यात आली.

सदरील सभेचा वेळ हा सकाळी साडेअकरा वाजताचा निश्चित करण्यात आला असुन कार्यक्रमांमध्ये शांतता, शिस्तबद्धता प्रस्थापित रहावी यासाठी मोठ्या प्रमाणात मराठासेवकांची गरज भासणार आहे त्या दृष्टीने सर्वसामान्य मराठ्यांनी आता आपल्या भविष्याची लढाई लढण्यासाठी सरकारची झोप उडवण्यासाठी मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत दाखल होऊन या ऐतिहासिक सभेला यशस्वी करण्यात हातभार लावावा.

असे आवाहन आजच्या सभास्थळी मैदानावर पार पडलेल्या बैठकीतून करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर नांदेड जिल्ह्यातून जवळपास दीड हजार मराठा सेवक या महामेळाव्यात स्वयंसेवकाची भुमिका बजावणार आहेत त्यात प्रकर्षाने महिलांची संख्या सुद्धा लाक्षणिक असणार आहे. त्यासाठी तशी रीतसर पूर्व नोंदणी आवश्यक असुन, त्याकरिता समाज बांधवांना आवाहन करण्यात येते आहे की कृपया आपण खालील क्रमांकावर संपर्क साधुन आपली नाव नोंदणी करावी.

महिलाकरिता नाव नोंदणी साठी सुचिता जोगदंड-वडजे 8208857039, डॉ विद्या पाटील -9665539053, मिनाक्षी पाटील -9175450395 यांना संपर्क करावा तर
पुरुष स्वयंसेवकांनी बालाजी कदम 9763686777, सुभाष शिंदे 9175487000, माधव घोगरे 9423188136आणि नाना वानखेडे 9730939963 या क्रमांकावर फोन करून नोंदणी करावी आणि लाखोंच्या संख्येने या ऐतिहासिक महामेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version