नांदेड| राज्यभरातील तांड्यांवर असलेल्या मंदिरांची स्वच्छता आणि त्या ठिकाणी भजनसंधेचे आयोजन करण्याची मोहीम सर्वत्र सुरू करण्यात आल्याची माहिती भाजपा प्रदेश वस्ती तांडा संपर्क अभियानाचे संयोजक डॉ. मोहन चव्हाण यांनी दिली.

येत्या 22 जानेवारी रोजी आयोध्येत होत असलेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील तांड्यांवर असलेल्या सर्व मंदिरांची साफसफाई करणे, तेथे पताका ,दिवे लावणे,रांगोळी काढणे आणि भजनसंधेचे आयोजन करणे असे या मोहिमेचे स्वरूप आहे. डॉ. मोहन चव्हाण यांचा प्रदेशातील प्रत्येक तांडा – वस्ती भागात असलेला प्रत्यक्ष जनसंपर्क यामुळे या मोहिमेला मोठा प्रतिसाद आणि गती मिळत आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version