नांदेड। मराठा समाजाला सरसगट कुणबी दाखले देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करावा या मुख्य मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करीत होते . सरकारच्या मन धरणीनंतर सतराव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आमरण उपोषण सोडून त्या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये साखळी उपोषण करण्यात यावे असे आवाहन केले होते .

गाव पातळीवर सुद्धा या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत सर्वसामान्य मराठ्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेड येथे दिनांक 29 सप्टेंबर ते 13 ऑक्टोंबर साखळी उपोषणास बसण्याचा निर्धार समस्त मराठा महिला भगिनीनी केला आहे.

सदरील हे साखळी उपोषण अतिशय लोकशाही मार्गाने करण्यात येणार असुन मराठा समाजाच्या न्यायिक मागण्या शासन दरबारी पोहचण्यासाठी उचललेलं हे संविधानिक पाऊल मराठा आरक्षणाच्या दृष्टीने अतिशय मोलाचे ठरणार असुन राज्य सरकार ने केलेल्या विनंती ला मान देऊन मराठा समाजाच्या सर्वच आंदोलकांनी शासनास सरसकट कुणबी दाखले देण्यासाठी चाळीस दिवसाचा कालावधी दिला असुन, या दरम्यान राज्यभर संविधानिक पद्धतीने आंदोलन चालुच राहणार आहेत,त्याचाच एक भाग म्हणुन नांदेड येथे समस्त सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा भगिनी साखळी उपोषण करण्यात येणार आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version