इज्जतगांव येथील गावालगदच्या अनधिकृत विटभट्या हटवण्याची मागणी

ऊस उत्पादक संघांचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर डोईफोडे यांची जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
2 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नायगाव, रामप्रसाद चन्नावार| नायगाव तालुक्याला लाभलेले वैभव म्हणजे गोदावरी नदी. गोदाकाठी असलेली गावे सध्या प्रदूषनाच्या विळख्यात सापडली आहेत. नदीकिनारी असलेल्या मोठं मोठ्या विट भट्या परिसरातील वातावरण दूषित करीत असल्याचे इथल्या नागरिकांने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.

नायगाव तालुक्यातील मौजे इज्जतगांव येथे गावालगतच मोठया विट भट्या आहेत त्याचा त्रास येथील लहान मुलांच्या आरोग्याला, वयोवृद्ध असणाऱ्या लोकांना होत आहे.तसेच येथील वीट भट्यातून सतत येणाऱ्या धुरामुळे श्वसनाचे आजार वाढत आहेत. यावर आळा बसावा म्हणून गावालगत असलेल्या पांगरीकर आणि मियाॅं शेठ यांच्या विटभट्या हटवा अशी मागणी महाराष्ट्र ऊस उत्पादक संघाचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर पाटिल डोईफोडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

सदरील विटभट्या गावालगत असल्यामुळे त्यांच्या प्रदुषणाचा त्रास गावकऱ्यांना होत आहे, श्वसनाचे आजार वाढत आहेत, विटभट्यांच्या प्रदुषनयुक्त धुवामुळे पिकाचे नुकसान होत आहे, विटभट्यासाठी कामगार वेगवेगळ्या भागातून येऊन तिथे राहतात त्यांच्यामूळे कारखानाच्या बाजूच्या शेतीमध्ये प्लाॅस्टिक कचरा, वातावरण दुषित होत आहे. सदरील विटभट्यानी गावात येणाऱ्या मुख्यः डांबर रस्त्यावर अतिक्रम केले असल्यामूळे अपघात होऊ शकतो याला जिम्मेदार कारखानदार असतिल, असे निवेदनात म्हंटले आहे.

ग्रामपंचायतीने गावातील अवैध धंद्यांना पाठबळ देऊ नये तसेच येथील कारखानादार विजेची चोरी करतात तरी महावितरण याकडे दुर्लक्ष करते ही गंभीर बाब असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सदरील विटभट्या गावापासून किमान १ कि.मी अंतरावर हलविण्यात यावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय समोर अमरण उपोषणास करण्याचा इशारा महाराष्ट्र ऊस उत्पादक संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष परमेश्वर व्यंकटराव डोईफोडे यांनी दिला. या निवेदनावर गावातिल मा.सरपंच संजिव दिंगबरराव पाटिल, ग्रा.पं.सदस्य डोईफोडे, गोविंदराव डोईफोडे, बालाजी टोकलवाड, तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव डोईफोडे , दत्तराम माधवराव पोलीस पाटिल, शिवाजी डोईफोडे चेअरमन, नुकसानग्रस्त शेतकरी व्यंकटराव डोईफोडे, संभाजी डोईफोडे, बालाजी डोईफोडे, दिंगाबर डोईफोडे, चंपत डोईफोडे आदी लोकांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!