होय तो “देवदूत” पुन्हा महाराष्ट्रात आला..! – भाजपा गजानन जोशी

'आयुष्यमान भारत - मिशन महाराष्ट्र समिती' गठीत

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
2 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नांदेड| भारताचे यशस्वी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींजींनी गोरगरीब,कष्टकरी,मध्यमवर्गीय बांधवांसाठी आयुष्मान भारत योजना ही वैद्यकीय मदतीची सेवा सुरू केली यात ५ लक्ष रुपये पर्यन्त शस्त्रक्रिया ह्या कॅशलेस आणि मोफत केल्या जाणार आहेत.

महाराष्ट्रातील महायुती सरकारने “आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र” समिती गठीत केली असून आता पुन्हा आरोग्याचा महायज्ञ सुरू होणार आहे,उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊंचा तो संदेश पुन्हा अंमलात येणार ‘ओमप्रकाश’ पैश्या अभावी महाराष्ट्रात एकाही रुग्णाचा मृत्यू होता कामा नये..!

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची आरोग्याप्रती संवेदनशीलपणा जपत आरोग्याच्या मिशनचे यशस्वी ध्येय बाळगत तत्कालीन भाजपा सरकारद्वारे २५ लाख पेक्षा जास्त गोरगरिबांना उपचारासाठी १५०० कोटी रुपये खर्च करणाऱ्या देशातील पहिल्या ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे तत्कालीन कक्ष प्रमुख आरोग्यदूत,’देव’दूत ओमप्रकाश शेटे साहेबांची ‘आयुष्यमान भारत – मिशन महाराष्ट्र समिती’ कक्षप्रमुख पदी
नियुक्ति करण्यात आली असून,गोरगरिबांच्या मोठ्या आजाराच्या उपचाराची चिंता आता मिटणार!

राज्यातील गोरगरिबांना मोफत उपचारासाठी मदत व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘आयुष्यमान भारत – मिशन महाराष्ट्र समिती’ कक्ष स्थापन करण्याचा निर्णय करण्यात आला आहे. या समितीत विविध विभागाचे शासकीय अधिकारी सहभागी असणार आहेत…

राज्यातील जनतेचे दररोज असंख्य फोन येतात उपचारासाठी मदत हवी आहे म्हणून,परन्तु काही तांत्रिक अडचणींमुळे वेळेत मदत मिळत नव्हती,आता जनतेच्या आरोग्यसेवेसाठीचा प्रश्न या माध्यमातून सुटला आहे. ‘आयुष्यमान भारत – मिशन महाराष्ट्र समिती’ हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा खूप मोठा निर्णय आहे. या निर्णयामुळे गोर गरीब जनतेचा आशिर्वाद सदैव महायुतीच्या पाठीशी कायम असणार आहे… गजानन जोशी, प्रदेश का.निमंत्रित सदस्य,भाजपा

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!