इंडिया मेगा ऍग्रो कंपनी विरोधात शेतकरी सामूहिक जलसमाधी घेणार

मंत्रालय मध्ये रयत क्रांती संघटनेचे पांडुरंग शिंदे यांनी दिले निवेदन

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
2 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नांदेड। कुष्णूर एमआयडीसी येथील इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनीचे संचालक यांना तात्काळ अटक करावी व शेतकऱ्याचे हक्काची रक्कम देण्यात यावी अन्यथा अन्यायग्रस्त शेतकरी नांदेड येथील गोदावरी नदी पात्रामध्ये सामूहिक जलसमाधी घेणार असा इशारा रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी आज मुंबई येथे मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पांडुरंग शिंदे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कुष्णूर एमआयडीसी येथील इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनीने 1200 शेतकऱ्याचा शेतमाल (हरभरा सोयाबीन, हळद इ ) सन 2020- 21 या काळात खरेदी केला होता. या शेतकऱ्याचे 21 कोटी रुपये कंपनी देणे बाकी आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या रक्कमेसाठी अनेकदा कंपनीच्या विरोधात विविध प्रकारे आंदोलने केली. दि.१४/०८/२३ रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय समोर सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. या आंदोलनाची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या आदेशानुसार कुंटूर पोलीस स्टेशन येथे दि.१८/०९/२३ रोजी कंपनीचे संचालक अजय कुमार बाहेती ,अविनाश काबरा व नागोराव बांद्रे यांच्या विरोधात कलम ४२०,४०६, ४०९,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होऊन तब्बल ४ महिने झाले आहेत. शेतकऱ्याला फसवणाऱ्या गुन्हेगाराला अटक झाली नाही, तो उधळ माथ्याने समाजामध्ये व वेगवेगळ्या शहरांमध्ये मोजमजा करत फिरत आहे. दुसरीकडे अन्यायग्रस्त शेतकरी व कुटुंब तणावाखाली जीवन जगत आहेत.

शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपनीच्या संचालकाला तात्काळ अटक करावी व सर्व शेतकऱ्यांचे पैसे देण्यात यावे ,अशी आम्ही आपणास विनंती करत आहोत, अन्यथा रयत क्रांती संघटना सर्व शेतकऱ्याला घेऊन नांदेडच्या गोदावरी पात्रामध्ये सामूहिक जल समाधी घेणार याची दखल प्रशासनाने घ्यावी. या निवेदनाची प्रत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री यांना सुद्धा देण्यात आली.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!