नांदेड| महिला या समाजातील प्रमुख घटक असून लोकशाही बळकटीकरणासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मतदान जनजागृतीच्या नोडल अधिकारी मिनल करनवाल यांनी केले.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत वडेपूरी येथे आयोजित सह्याद्री आदर्श प्रभाग संघाच्या वतीने मतदार शपथ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी गट विकास अधिकारी आडेराघो, जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन पातेवार, गट शिक्षणाधिकारी एन.एम. वाघमारे, श्रीमती अंबलवाड यांची उपस्थिती होती.

पुढे त्या म्हणाल्या, मागच्यावेळी नांदेड लोकसभा मतदार संघासाठी 65 टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत असून महिलांनीही यात पुढाकार घेवून शंभर टक्के मतदार करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले.

आज जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये उमेद स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी गावात मतदाना विषयी जनजागृती करुन मतदानाची शपथ घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आज सुमारे दोन लाख पेक्षा अधिक महिलांनी प्रत्येक गावात शंभर टक्के मतदान करण्याची शपथ घेतली आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version