देश-विदेशनांदेड

विमानतळाला पुन्हा परवाना ‎‎बहाल; नांदेडहून पुन्हा विमान उड्डाणाचा मार्ग ‎‎मोकळा

नांदेड| मागील अनेक वर्षांपासून विमानतळ बंद झाल्याने नांदेडमधून एअर इंडिया ‎आणि ट्रूजेट या कंपन्यांची सेवा बंद ‎‎झाल्यानंतर नागरी उड्डाण विभागाने ‎‎येथील विमानतळाचा परवानाही रद्द ‎‎केला होता. मात्र, २७ फेब्रुवारी पासून ‎‎येथील विमानतळाला पुन्हा परवाना ‎‎बहाल करण्यात आला आहे. आता ‎‎नांदेडहून पुन्हा विमान उड्डाणाचा मार्ग ‎‎मोकळा झाला आहे. नागरी विमान‎ उड्डाण विभागाच्या संचालकांनी ‎मंगळवारी जिल्हाधिकारी ‎कार्यालयात टेलिफॅक्स करून ही‎ माहिती दिल्याने लवकरच दिल्ली‎ व मुंबई येथे विमानसेवा सुरू होणार‎ आहे.‎

२००८ मध्ये नांदेड येथील‎ विमानतळ अद्ययावत होऊन येथून‎ विमानसेवा सुरू झाली होती. परंतु‎ अधून मधून ही सेवा खंडित झाली ‎होती. दरम्यान, त्यावेळी केंद्र ‎शासनाचा अंगीकृत उपक्रम‎ असलेल्या एअर इंडिया या कंपनीने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ दिल्ली-नांदेड-मुंबई अशी सेवा सुरू‎केली होती. तर हैदराबादच्या ट्रूजेट ‎या कंपनीने हैदराबाद-नांदेड-मुंबई‎ अशी सेवा सुरू केली होती. मात्र‎ २०२१ मध्ये कोरोनामुळे ही सेवा बंद पडली होती.‎ विमानसेवा बंद झाल्याने‎ नांदेडकरांची मोठी गैरसोय झाली‎. देश-विदेशातील शीख‎ भाविकांना नांदेड येथे सचखंड‎ हुजूर साहिब गुरुद्वारा येथे मथ्था‎ टेकण्यासाठी येणे शक्य होत नव्हते.‎ मात्र आता विमानसेवा सुरु झाल्यामुळे प्रवाश्याना दिलासा मिळणार आहे.‎

लवकरच नांदेड येथून ‎दिल्ली व मुंबई येथे विमानसेवा सुरू ‎होईल, असा विश्वास खासदार प्रतापराव ‎पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला ‎आहे. तसेच पुणे व तिरुपती येथेही‎ सेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न ‎करणार असल्याचे त्यांनी सांगितले.‎

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!