होट्टल महोत्सव प्रशासनाने चूक सुधारावे – आ. जितेश अंतापुरकर

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
2 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नांदेड, गोविंद मुंडकर| नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील होट्टल हे गाव आणि येथील प्रशासनाच्या पुढाकाराने होणारा महोत्सव. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला. प्रशासनातील काही विकृत मंडळींनी हे मीच केले असा अविर्भाव आणून, वाटल ते बदल करत असल्यामुळे जनतेत तीव्रनापसंधी पसरली आहे. याबाबत आमदार जितेश रावसाहेब अंतापुरकर यांनी प्रशासनाने वेळेत चूक सुधारावी अशी सूचना केली आहे.

महाराष्ट्रातील वेरूळ अजंठा यानंतर होट्टल येथे महोत्सव साजरा होतो. याबाबत तत्कालीन आमदार सुभाष साबणे आणि माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी आपापल्यापरीने विशेष प्रयत्न केले होते. अंतापुरकर यांच्या प्रयत्नाला अशोकराव चव्हाण यांनी प्रतिसाद दिला होता. सार्वजनिक हितासाठी पुढाकार म्हणून आपल्या कुवत क्षमतेप्रमाणे प्रयत्न केले होते. तत्कालीन संवेदनशील जिल्हाधिकारी श्री सुरेश डोंगरे यांनी बिलोली आणि देगलूर येथील अनेकांचे श्रद्धास्थान आणि कुलदैवत असलेल्या होट्टल बाबत सकारात्मक अहवाल तयार करून होट्टल महोत्सव सुरू केले होते. सीमावर्ती भागातील प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर यांनीही याबाबत पाठपुरावा केलेला होता.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील होट्टल हे गाव आणि येथील प्रशासनाच्या पुढाकाराने होणारा महोत्सव. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला. प्रशासनातील काही विकृत मंडळींनी हे मीच केले असा अविर्भाव आणून नवीन आलेल्या कार्यप्रवण जिल्हाधिकारी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी यांची दिशाभूल करून वाटल ते बदल करत असल्यामुळे जनतेत तीव्रनापसंधी पसरली आहे. चांगल्या सामाजिक कार्यकर्त्यांची आणि लोकप्रतिनिधीबाबत गैरसमज पसरून मी आणि मी सांगितलेले निर्णय हे योग्य ! अशा कान गोष्टी करून प्रशासनाबाबत रोष वाढवत आहेत. अशी खरपूस टीका होट्टल येथील ज्येष्ठ ग्रामस्थ यांनी व्यक्त केली. यापूर्वी त्या कर्मचाऱ्याबाबत प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले होते.

याबाबत आमदार जितेश रावसाहेब अंतापुरकर यांनी प्रशासनाने वेळेत चूक सुधारावी अशी सूचना केली आहे. जनतेतील संताप लोकप्रतिनिधी आणि ज्येष्ठ ग्रामस्थ व नागरिकांचा राग आता श्रद्धेचा भाग बनत चालला आहे. अनेकांच्या श्रद्धा ढासळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशासनातील शुक्राचार्यांना आवरा अशी भूमिका देगलूर पाठोपाठ बिलोलीतूनही व्यक्त होऊ लागली आहे.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!