महाविकास आघाडी सरकारच्या काळात भंडाऱ्यात ११ बालकांचा शॉर्टसर्किटने जळून मृत्यू झाला त्या मतांचे अश्रू नाही दिसले का..?

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
2 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नांदेड। सरकार बदलल्यावर एका वर्षातच रुग्ण मृत्युमुखी पडत असल्याचा सूर विरोधी पक्षाचे नेते आवळत आहेत. त्यांना हि वेळ उत्तर देण्याची नाही. पण अडीच वर्ष तुमचे सरकार होते. त्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात भंडाऱ्यात ११ बालकांचा शॉर्टसर्किटने जळून मृत्यू झाला होता. त्या मतांचे अश्रू नाही दिसले का..? तुम्हाला. त्यावेळी आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा का मागितला नाही. अन्‌ आता नांदेडला येऊन सुप्रियाताई सुळे या आरोप करून गेल्या. तुमच्या वेळचे सांगता येत नसले तर मी येते सांगायला. तुम्ही सध्या राजकीय सलाईन घेऊन फिरत आहात, असा आरोप भाजप महिला मोर्चांच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी केला.

त्या नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात पाहणी करण्यासाठी सोमवारी नांदेडात आल्या होत्या. यावेळी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या कि, मृत्यू पावलेल्या घटनेचे समर्थन आम्ही कदापि करणार नाही. परंतु रुग्णालयात २०२० ते २०२३ पाऱ्यांत आतापर्यंत दररोज सरासरी होणारे मृत्यू है १३ च्या जवळपास आहेत. ग्रामीण भागात काम करणाऱ्या आशा वर्कर गोळ्या देतात, परंतु महिला त्या घेत नाहीत. अशी माहिती बालरोग विभागातील काही बाळांच्या आईने दिली. डॉक्टरने सांगितलेल्या गोळ्या घेतल्या असत्या तर बाळ सुदृढ झाले असते है मी त्यांना सांगितले. आपण त्यांना गोळ्या देऊ शकतो. परंतु गीळायला देऊ शकत नाही, आयसीयू मध्ये कधीच औषधी साठ्यांचा तुटवडा नव्हता. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी देखील औषधी साठा उपलब्ध होता. आम्ही डॉक्टर नाहीत पण रेकॉर्डवरील माहिती देत आहोत असेही वाघ म्हणाल्या.

गेल्या ३ वर्षाच्या रेकॉर्डवरून रुग्ण हे अत्यवस्थ झाल्यानंतर येथे आणले जातात. खाजगीत उपचार संपल्यानंतर रुग्ण घरी घेऊन जा म्हणून सांगितले जाते. ज्यावेळी सगळे नाकारतात तेव्हा घरी नेण्यापेक्षा सरकारीत दाखल करू म्हणून इकडे लोक येतात. डॉक्टर मिळालेल्या वेळेत त्यांच्यावर उपचार करतात. परंतु मृत्यूनंतर त्याचे खापर सरकारी दवाखान्याचेवर फुटते. परंतु यावरून विरोधी पक्षांना राजकारण करायचे आहे. महाविकास आघाडीच्या काळात सर्व शासकीय रुग्णालयांचे ऑडिट करणार, अशी घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात किती रुग्णालयांचे ऑडिट झाले? असा सवालही चित्र वाघ यांनी केला.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!