हिमायतनगर तहसील कार्यालयावर मुळ आदिवासी समाजाचा विविध मागण्यासाठी विराट मोर्चा धडकला

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
2 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

हिमायतनगर,परमेश्वर काळे| महाराष्ट्रातील धनगर समाजांना मूळ आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील तहसील कार्यालयावर बुधवार दि 13 डिसेंबर रोजी मूळ आदिवासी समाज बांधवांचा विराट मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये घोषणा ,फलक घेऊन महिलासह विद्यार्थ्यीनी, विद्यार्थी व समाज बांधव नागरीकांचा मोठा सहभाग होता.

हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय मैदानात सकाळी १२ वाजता मूळ आदिवासी समाज बांधवांचा जमाव करण्यात आला. येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर व जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून शहरापासून आदिवासी समाज बांधवांचा विविध मागण्याचा विराट मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता. या मोर्चातील मुळ आदिवासी समाजाने धनगर जात, किंवा कोणत्याही जातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नये, धनगरांना आदिवासी च्या सवलती देण्यासाठी स्थापन केलेली सुधाकर शिंदे समिती तात्काळ रद्द करण्यात यावी.

धनगर जात व आदिवासी जमातीचा सर्वेक्षण करून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, (tiss) राज्य शासनाला सादर केलेला अहवाल अधिवेशन वाचन करून जनतेसमोर आणावा, यासह हिमायतनगर येथील आदिवासी मुला मुलींचे वसतिगृह सर्व सुविधेसह स्वातंत्र्य इमारत बांधण्यासाठी शहरालगत जागा उपलब्ध करून द्यावी. यासह विविध मागण्यांसाठी मुळ आदिवासी समाजाचा विराट मोर्चा जननायक भगवान बिरसा मुंडा, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैल चित्रासह घोषाबाजी देत हिमायतनगर तहसीलवर धडकला होता.

विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी आदिवासी सल्लागार समितीचे दत्तात्रेय वाळके, भुजंगराव डवरे, नामदेव डुडुळे, शेषराव वाळकीकर, खोब्राजी वाळके, डॉ .डि. डि. गायकवाड, कांताराव धुमाळे, काशिनाथ मेंडके, उतम धुमाळे, गुणवंत टारपे, माधव डवरे, दत्ता कर्हाळे, रामदास भडंगे, वसंत डवरे, रोशन धनवे, अभिषेक खुपशे, सत्यवृत ढोले, मारोती बोथीगे, रामराव भिसे, किशोर धुमाळे, रघोजी डावरे, एकनाथ बुरकुले, संजय माझळकर, मारोती गवले, यांच्यासह महिला व आदिवासी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते. आदिवासी समाज बांधवांच्या विविध मागण्याचा मोर्चा राष्ट्रीय महामार्गने निघाल्यानंतर तहसील कार्यालय ते हिमायतनगर मंगल कार्यालय कमानीपर्यंत रांग लागली असल्याचे चित्र पाहावयास मिळाले, दरम्यान आंदोलन शांततेत होण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!