क्राईमनांदेड

हेरंब कुलकर्णीवरील हल्लेखोरावर कठोर कारवाई करा- विविध सामाजिक संघटनांचे निवेदन

नांदेड। विख्यात लेखक व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर अहमदनगर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी तसेच अशा प्रकारच्या घटनावर पायबंद करण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका शिष्टमंडळाने केली.

प्रा.बालाजी कोमपलवार, डॉ.विलास ढवळे, दत्ता तुमवाड, बालाजी पवार, वसंत जवादवार, शेतकरी संघटनेचे अॅड धोंडीबा पवार, कॉम्रेड उज्वला, शेख नजीर, शकीला शेख, चंद्रकांत घाटोळ, अरुण दगडू, बाबू जलदेवार आदींनी निवासी उपजिल्हाधिकारी वडदकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा केली.

हेरंब कुलकर्णी हे प्रागतिक चळवळीचे शिलेदार असून सामाजिक बदल घडविणारे कृतीशील सुधारक आहेत. त्यांच्यासारख्या विवेकवादी चिंतकावरील हा हल्ला विशिष्ट विचारावरील हल्ला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये यासाठी सतर्क बाळगावी यासाठी वेगळी कृती दल असावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी लेखक, संपादक, सामाजिक कार्यकर्ते, वृत्तपत्राचे प्रतिनिधी, आदि यात सहभागी होते.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!