नायगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी सौ.अर्चना संजय चव्हाण यांची बिनविरोध निवड

NewsFlash360 Staff
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नायगाव, रामप्रसाद चन्नावार| नायगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी सौ.अर्चना संजय चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नायगाव शहराच्या नगरपंचायतची निवडणूक झाली तेव्हा अध्यक्षपद हे खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव सुटले होते. खुल्या महिला प्रवर्गातून तीन महिला असल्यामुळे मा. आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांनी अडीच वर्षाचा कालावधी तीन महिलांमध्ये भागून देण्याचे ठरवले त्या दृष्टीने प्रथम नगराध्यक्ष म्हणून गीताताई नारायण जाधव यांनी दहा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण केला यानंतर मीनाताई सुरेश पाटील कल्याण यांनी दहा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण केला आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे मा.आमदार वसंतराव पाटील चव्हाण साहेब यांनी आज प्रभाग क्रमांक 13 मधून निवडून आलेल्या अर्चना संजय चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात केली.

आजच्या या अध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी म्हणून एस.डी.एम.गिरी साहेब व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भगत मॅडम यांनी निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर आमदार वसंतराव चव्हाण साहेबांना अर्चना चव्हाण यांना नगराध्यक्षाच्या खुर्चीवरती बसून त्यांचे सन्मान केले यावेळी मित्र मंडळाच्या वतीने आणि अध्यक्ष च्या वतीने माजी आमदार वसंतराव चव्हाण साहेबांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला.

यावेळी युवा नेते रविंद्र पाटील चव्हाण,हनमंतराव पाटील चव्हाण, माधव आप्पा बेळगे,श्रीनिवास चव्हाण,विजय पा.चव्हाण, सुरेश पा. कल्याण, नारायण जाधव,पंढरी भालेराव,रमेश पा.शिंदे, शरद भालेराव, पांडुरंग चव्हाण,माणिक चव्हाण,विजय भालेराव,विठ्ठल बेळगे बालाजी शिंदे,नावनाथ जाधव, साईनाथ चन्नावार,समीरभाई,मा.आमदार वसंतराव पा. चव्हाण मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते सर्व काँग्रेस पक्षाचे नगरसेवक काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!