पोलीस पाटील भरती प्रक्रियेत अनियमतता, नियुक्ती निवडीस आक्षेप

होटाळा येथील अपात्र चार उमेदवारांचा प्रजासत्ताक दिनी आत्मदहनचा इशारा

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
2 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नायगाव, रामप्रसाद चन्नावार| गावात सलोखा राहावा याकरिता पोलीस पाटील पदाची निर्मिती करण्यात आली असली तरी या अनुषंगाने मौजे होटाळा येथील पोलीस पाटील भरती प्रक्रियेत मुलाखतीमध्ये अनियमतता झाली आहे असा आक्षेप घेऊन ही निवड प्रक्रिया रद्द करण्यात यावी म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे होटाळा येथील अपात्र असलेल्या चार उमेदवारांनी 24 जानेवारी रोजी उपोषण तर प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

बिलोली येथे संपन्न झालेल्या पोलीस पाटील भरती प्रक्रिया मुलाखतीत अनियमतता असल्याचा आक्षेप होटाळा येथील अपात्र ठरलेल्या चार उमेदवारांनी घेतला आहे. पात्र व अपात्र सर्व उमेदवाराचे लेखी व तोंडी गुण कोणास किती प्राप्त झालेले आहेत आणि तोंडी गुणाची श्रेणीकरण कसे करण्यात आले याची माहिती प्राप्त व्हावी व मुलाखती दरम्यान उपविभागीय अधिकारी बिलोली यांनी कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ रेकॉर्ड केले नाही जर केले असल्यास आम्हाला देण्यात यावे असाही उल्लेख दिलेल्या निवेदनात करीत मुलाखतीमध्ये अधिकचे गुण घेऊन श्रीराम शिवाजीराव पवार यांनी सदर पदाची निवड होण्यापूर्वीच मीच पोलीस पाटील होणार म्हणून गावभर प्रसार केलेला आहे, शेवटी पैसा मोठा झाला असल्याचे दिसून आला आहे असाही खुलासा निवेदनात करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करून ही निवड प्रक्रिया रद्द करण्यात यावी अन्यथा दिनांक 24 जानेवारी रोजी उपोषण व प्रजासत्ताक दिनी आपण आत्मदहन करणार असल्याचा इशारा अपात्र उमेदवार अमोल आनंदराव जाधव, विकास जयवंतराव शिंदे, सुधीर संभाजी पवार व राजेश दादाराव पवार यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना दिलेला आहे.

पोलीस पाटील भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेत जास्तीचे गुण प्राप्त असूनही तोंडी मुलाखती मधून सावळा गोंधळ झालेला आहे अशी चर्चा अनेक गावातील नागरिकातून होत आहे.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!