कृषीनांदेड

हिमायतनगर तालुका कृषी कार्यालयांतील खुर्च्या रिकाम्या ; वरिष्ठांनी लक्ष घालुन शेतकऱ्याची लूट थांबविण्याची मागणी 

हिमायतनगर। हिमायतनगर येथील तालुका कृषी कार्यालयाला अधिकारी व कर्मचारी हे वारंवार दांडी मारत असल्याने कार्यालयांत शुकशुकाट जाणवत आहे.  सध्या खरिपाची पेरणी नजीक आली असताना हे अधिकारी, कर्मचारी गैरहजर राहत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून कृषी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्वैराचार थांबवण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष घालावे. अशी मागणी शेतकरी करित आहेत.

खरिपाची पेरणी अगदीच तोंडावर आली असून शेतकऱ्यांना खरीप पेरणी साठी लागणारे बी बियाणे व रासायनिक खते कोणते वापरावे, या बाबतीत मार्गदर्शनाची खरी गरज असताना या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मात्र सातत्यानं कार्यालयाला जाणीवपूर्वक गैरहजर राहत आहेत.  सद्यस्थितीत  शेतकरी बी, बियाणे व रासायनिक खतांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची कृषी दुकानावर गर्दी झाल्याचे पहावयास मिळत असून कृषी दुकानदार शेतकर्‍याना चढ्या भावाने बी बियाणे व रासायनिक खतांची विक्री करीत असल्याची ओरड होत आहे.  मात्र कर्तव्य तत्परता विसरलेले अधिकारी व कर्मचारी व त्यांची पथके बघ्याची भुमिका घेत असल्याचे ही शेतकऱ्यांतून बोलल्या जात आहे.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!