नांदेडमहाराष्ट्र

ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या स्वच्छतेसाठी लोकचळवळ व्हावी – जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.बी.गणवीर

नांदेड,अनिल मादसवार। गड-किल्ले जोपासने व त्यांची निगा राखणे ही आपली संस्कृती असून हा अमूल्य वारसा जोपासण्यावर भर देणे आवश्यक आहे. युवा पिढीने हा वारसा जतन करण्यासाठी सामाजिक जाणीवेतून सहभाग घ्यावा व या स्वच्छता मोहीमेला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त व्हावे, असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर. बी. गणवीर यांनी सांगितले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त नंदगिरी किल्ला स्वच्छता मोहीमेच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सूरज गुरव, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुर्यवंशी, नेहरू युवा केंद्राच्या चंदा रावळकर, उपप्राचार्य व्ही.डी. कंदेलवाड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षणार्थी यांची उपस्थिती होती.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून आज राज्यात गड-किल्ल्याची स्वच्छता करण्यात आली. त्याअनुषंगाने आज आयटीआय नांदेड यांच्या वतीने नांदेड येथील नंदगिरी किल्ल्याची व परिसराची स्वच्छता करण्यात आली. यात नांदेड आयटीआयच्या जवळपास 200 प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला. यापुढेही अशा स्वच्छता मोहिम आयोजित करण्यावर भर देण्यात येईल असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.बी.गणविर यांनी सांगितले.

ऐतिहासिक स्थळे जपण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून याशिवाय ही मोहिम अपूर्ण आहे. सामाजिक जाणीवेतून आपण हा ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे. यासाठी प्रत्येकांच्या मनात जागरुकता निर्माण होणे गरजेचे असल्याचे मत पोलीस उपविभागीय अधिकारी सुरज गुरव यांनी व्यक्त केले. गड-किल्ले आज आपण जतन केले तरच आपण पुढील पिढीपर्यत हा वारसा अधिक सक्षमपणे पोहचवण्यात यशस्वी होवू असेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी यात घेतलेला उत्स्फूर्त सहभाग ही कौतुकास्पद बाब असल्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुर्यवंशी यांनी सांगितले. या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेवून स्वच्छता केली याबाबत आम्हाला अत्यंत आनंद झाला असून आत्मिक समाधान मिळाले असल्याचे पुनम केंद्र या विद्यार्थ्यानीने यावेळी सांगितले.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!