जेवली येथे सहा घरांना आग; आगीत सात जनावरांचा होरपळून मृत्यू; शेतीचे साहित्य धान्य व कपडा आगीत स्वाहा

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
2 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

उमरखेड,अरविंद ओझलवार। बंदी भागातील जेवली येथील सहा घरांना आज दुपारी दोन वाजता अचानक आग लागल्याने घराजवळील गोठ्यात बांधून असलेले तेरा जनावरे आगीच्या भक्षस्थानी गेले तसेच शेतीचे साहित्य घरातील धान्य कपडा पूर्ण जळून खाक झाले .घरात कोणतीही व्यक्ती नसल्याने सुदैवाने मनुष्य हानी झाली नाही परंतु या आगीमुळे सहा घरातील शेतकरी व शेतमजूर कुटुंबाचे व व होत्याचे नव्हते झाले .

तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बंदी भागातील जेवली या गावातील शेतकरी सिन्हा मारुती धोत्रे व शेतमजूर दत्ता सोनुले , सिन्हा फकीरा काळे ,दत्ता धोत्रे ,संतोष धोत्रे , लक्ष्मण धोत्रे या सहा जणांच्या घराला आज दुपारी २ वाजता अचानक आग लागली यामध्ये घराजवळील गोठ्यात बांधून असलेले सिन्हा धोत्रे यांचे सहा गाईचे वासरू तथा तीन बोकड तर दत्ता धोत्रे यांचे दोन बोकड व लक्ष्मण धोत्रे यांचे दोन बोकड तसेच दत्ता सोनुले यांच्या तीन कोंबड्या आगीच्या भक्षस्थानी पडून मृत झाल्या .

घरातील सर्व सदस्य शेतीत काम करण्याकरिता गेले असल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. आग लागल्याचे समजतात गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले तसेच उमरखेड वरून अग्निशमन वाहन गेल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले परंतु तोपर्यंत सहा कुटुंबाचा संसार उध्वस्त झाला होता . याआगीत सिन्हा धोत्रे यांच्या घरातील शेतीचे साहित्य स्प्रिंकलर सट, पियुसी पाईप जळून खाक झाले .

घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे बीड जमदार व शिपाई यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले . या गीत शेतकरी व शेतमजूर यांचे संसार उध्वस्त झाला असून त्यांना शासनाने त्वरित मदत करण्याची मागणी केली.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!