हिमायतनगरात नगरपंचायतीने चालविला अतिक्रमणावर बुल्डोजर; अतिक्रमण हटाव मोहीम शहरात देखील सुरु ठेवण्याची मागणी

मुख्य महामार्गावरील अतिक्रमण हटवल्याने शहरातील रस्त्यांनी आता मोकळा श्वास घेतला

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
4 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरात नगर पंचायतीने रहदारी आणी वाहतुकीला होत असलेल्या अडथळा आणी नागरिकांच्या होत असलेल्या वारंवावरच्या तक्ररील लक्षात घेऊन शहरात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. गेल्या वर्षभरापासून शहरातील मुख्य चौक रस्त्यातील अतिक्रमण स्वयंस्फूर्तीने काढून घेण्यात यावे अश्या प्रकारच्या नोटीस बजावून देखील अतिक्रमण काढले जात नसल्याने आज दि.०७ नोव्हेंबर रोजी पोलीस बंदोबस्तात बोल्डोजर चालवीत शहरातील उमरचौक भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आल्याने नागरीकातून व वाहनधारकातून समाधान व्यक्त केले जात असून, येथील रस्त्यानी मोकळा श्वास घेतला आहे. यापूर्वी येथील काही वर्षपूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात अली होती, मात्र पुन्हा अतिक्रमण जैसे थे झाल्याने आज हे ठोस पाऊल उचलावे लागले असल्याचे सांगितले जात आहे.

हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच अनेक महत्वाच्या चौकात आणि कॉर्नवरवर अनेक पान टपऱ्या , हॉटेल्स, फळविक्रेते, वडा पाव सेंटर, हॉटेल्स, हातगाडी यासह इतर छोट्या – मोठ्या व्यावसायिकांनी आपले बस्तान मांडून अतिक्रमण केलं आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, यामुळे अनेकदा अपघात होत आहेत. आठवडी बाजारच्या दिवशी तर चक्क तासनतास वाहतुकीची कोंडी होऊन अपघातांना निमंत्रण मिळत आहे. धारकांनी आपले बस्तान वसविले होते.

हिमायतनगर शहरातील मुख्य असलेल्या उमर चौक परिसरातील चौकात जिल्हा परिषदेच्या गळायच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. याबाबत अनेकदा तक्रारी होऊन शुल्लक अर्णवरून भांडण तंटे निर्माण होत आहेत. त्यामुळे येथील अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी वाहनधारक, नागरिक, व ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांमधून केली जात होती. मागील काही वर्षांपूर्वी हिमायतनगर नगरपंचायतीने अतिक्रमण मोहीम राबवली. तरीही पुन्हा या भागात जैसे थे परिस्थिती निर्माण झाली होती. या अतिक्रमण धारकाना स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढून घ्यावे अश्या सूचना व पत्र नगरपंचायतीने दिले होते. मात्र कोणीही अतिक्रमण काढत नसल्याने दि.०७ नोव्हेंबर रोजी सोमवारी नगरपंचायतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेऊन अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यास सुरुवात केली.

अतिक्रमण काढण्यासाठी पथक येथे आलेले असताना देखील येथून अतिक्रमणाचे साहित्य हटविण्यास कोणीही पुढे येत नसल्याने नगरपंचातीने तगडा पोलीस बंदोबस्त घेऊन बुलडोझर फिरवला. त्यानंतर अनेक अतिक्रमण धारक आपापले सामान घेऊन जाण्यासाठी पुढे आले असल्याचे पाहावयास मिळाले आहे. आज या ठिकाणच्या जवळपास २० ते २५ जणांचे अतिक्रमण हटवण्यात आली आहेत. शहराच्या मुख्य महामार्गावरील अतिक्रमण हटवल्याने शहरातील रस्त्यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे. तर नगरपंचायतीने अतिक्रमणाच्या बाबतीत केलेल्या कार्यवाहीच्या बडग्यामुळे सर्वसामान्य नागरीकातून समाधान व्यक्त केले जात आहे. हि मोहीम नगरपंचातीचे प्रभारी मुख्याधिकारी ताडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ओएस महाजन व नगरपंचायतीचे कार्यालयीन कर्मचारी यांनी राबविली. यासाठी पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी व इतर पोलिसाचा मोठा फौजफाटा सहकार्यासाठी उपस्थित होता.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशानंतर नगरपंचायतीला शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्याची जाग आली असल्याने अतिक्रमण हटविले जात असल्याचे बोलले जात आहे. हिमायतनगर शहरातील हि अतिक्रमण हटाव मोहीम येत्या काही दिवसात शहरातील सर्वच मुख्य चौकात आणि रस्त्यावर राबवून हिमायतनगर शहरात होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सोडवावा. आणि वारंवार निर्माण होणाऱ्या रस्त्याच्या अडचणीची समस्या सोडवावी अशी मागणी होत आहे. आज काढण्यात आलेल्या अतिक्रमणानंतर पुन्हा अतिक्रमण धारकांनी बस्तान मांडल्यास त्यावर नगरपंचायत कोणती कारवाई करणार ? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

हिमायतनगरात नगरपंचायतचे बुलडोजर चालून अतिक्रमण हटाव मोहीम राबविली, यात हातावर पॉट असलेल्या छोट्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे आम्हा गरिबांची अतिक्रमणे काढून काही होत नाही शहरातील सर्वच मोठ्या व्यापाऱ्यांची आणि दुकानदारांची अतिक्रमण तसेच अनेक नागरिकांनी घरच्या माध्यमातून केलेले हवाई आणि रस्त्यावरील देखील अतिक्रमण देखील काढून नगरपंचायत प्रशासनाने पारदर्शक कारभार होत असल्याचे दाखवून द्यावे. अन्यथा अतिक्रमण काढण्यात राजकारण केले जात असल्याची शंका निर्माण होण्यास वाव आहे. अशी मागणी अतिक्रमणाच्या नुकसान झालेल्या अनेकांनी केली आहे.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!