सीटूच्या आंदोलनाकडे मनपाचे दुर्लक्ष मार्क्सवादी – लेनिनवादी पूरग्रस्तांच्या समर्थनार्थ रस्त्यावर

तीव्र निदर्शने करून दिला आयुक्तांना घेराव घालण्याचा इशारा

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
3 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नांदेड| जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे सानुग्रह अनुदान मिळायला पाहिजे म्हणून सीटू कामगार संघटनेने आतापर्यंत १३ आंदोलने केली आहेत. सात हजार लोकांना अनुदान दिल्याची यादी मनपा आणि जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केली असून नाल्याच्या काठावर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या खऱ्या पूरग्रस्तांना डावलण्यात आल्याच्या शकडो तक्रारी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत.

त्रुटीची राहिलेली पूरग्रस्तांची यादी मात्र अजून महापालिकेने तयार केली नाही. बोगस पूरग्रस्तांचा मुद्दा मागील चार महिन्यापासून नांदेड शहरात गाजत असून महापालिकेच्या वसुली लिपिक आणि तहसीलच्या तलठ्यानी काही निवडक लोकांच्या सांगण्यावरून प्रत्यक्षात पाहणी न करता घरी बसून याद्या तयार करून अनेक चुकीच्या लोकांना अनुदान मिळण्यासाठी पात्र ठरविले आहे. दिवाळीपूर्वी अनुदान आणि अन्न धान्य किट देण्यात येईल असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सीटूच्या शिष्टमंडळास सांगून ३ नोव्हेंबर रोजी उपोषण सोडविले होते परंतु अद्याप पात्र पूरग्रस्तांची दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही. दि.३० नोव्हेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर सामूहिक उपोषण सुरु असून प्रशासन खुपच हलक्यात घेत आहे.

चार महिने उलटले तरी अनुदान व रेशन किट मिळाली नाही म्हणजे प्रशासन किती उदासीन आहे हे विचार करायला नको. साधारणतः सहा कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आणि अनियमितता झाल्याच्या तक्रारी करीत आंदोलने सुरु असल्यामुळे प्रशासनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉ.विनोद निकोले यांच्या मार्फत मंत्रालय मुंबई मध्ये हा पूरग्रस्त निधी घोटाळा गाजणार असल्याचे संकेत सीटू संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी दिले आहेत.

चार महिन्यापासून सुरु असलेले पूरग्रस्तांचे आंदोलन थांबत नसल्याने संघटनेने लढा निधी स्वरूपात आवाहन करून जमा केलेला निधी परत देण्यात यावा यासाठी काही रजकीय मंडळी पूरग्रस्तांना प्रोत्साहन देत असून संघटनेची पावती सीटू कार्यालयात घेऊन यावे आणि रीतसर अर्जंप्रक्रिया पूर्ण करून पैसे परत घेऊन जाण्याचे आवाहन देखील संघटनेने केले आहे.

राहिलेल्या पूरग्रस्तांची यादी जोपर्यंत प्रसिद्ध होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील आणि यापुढील आंदोलन हे महापालिकेच्या आयुक्तांना घेराव आंदोलन असेल असे मार्क्सवादी – लेनिनवादी न्यू डेमोक्रासीचे सचिव कॉ.दिगंबर घायाळे यांनी दिला असून सीटू च्या राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार ह्या देखील आक्रमक झाल्याच्या दिसून आल्या.राहिलेल्या पूरग्रस्तांचे अर्ज स्वीकारून अनुदान द्यावे ही मागणी देखील सातत्याने होत आहे.

आंदोलनाचे नेतृत्व कॉ. उज्वला पडलवार, कॉ.दिगंबर घायाळे,कॉ. मारोती केंद्रे, कॉ.सोनाजी कांबळे, कॉ.प्रदीप सोनाळे कॉ. मारोती घोरपडे, सुभाष कोठेकर आदींनी केले आहे. लवकरच त्रुटीची यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आपत्कालीन विभागाचे डॉ.खानसोळे आणि बेग यांनी वर्तविली आहे परंतु अनुभव वाईट असल्यामुळे मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असणार असल्याचे सीटू ने निश्चित केले आहे.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!