उन्हाला घाबरु नका, मतदानासाठी बाहेर पडा ! जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत

प्रतिक्षालयासोबतच वैद्यकीय व्यवस्थाही मतदाराच्या दिमतीला आरोग्य विभाग सज्ज प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोचार पेटी

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
4 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नांदेड| नांदेड लोकसभेसाठी 26 एप्रिलला मतदान होत आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर गेले आहे. यामुळे अनेक मतदार उन्हात बाहेर पडण्याचे टाळून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र आता घाबरण्याची गरज नसून आरोग्य विभागाने प्रत्येक केंद्रावर प्रथमोचार पेटी ठेवली आहे. याशिवाय एखाद्याला जास्त गरज भासल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात दाखल करता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने घाबरून न जाता 26 एप्रिलला मतदानासाठी घराबाहेर पडावे व मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

एप्रिल महिना अर्धा पालटला असून जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली आहे. 26 एप्रिलला मतदानाच्या दिवशी मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदारांच्या आरोग्याची प्रशासनाकडून काळजी घेतली जाणार आहे. आरोग्य विभागाच्यावतीने प्रत्येक मतदार केंद्रावर प्रथमोपचार पेटीची सोय केली आहे. तसेच मतदानादरम्यान मतदारांची प्रकृती खालावली आणि त्यांना उपचारासाठी आरोग्य संस्थेत आणले तर शासनाच्या प्रत्येक आरोग्य संस्थेत मतदानाच्या दिवशी डॉक्टर कार्यरत राहणार असून ते मतदारांच्या प्रकृतीची काळजी घेणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोपचार किट ठेवण्यात आली आहे. पॅरासिटामोट, ओआरएस आणि प्रथमोपचारासाठी लागणारे सर्व साहित्य असलेली किट तयार करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्राला ही किट वाटप करण्यात आली आहे. तरी सर्व मतदारांनी उन्हाला न घाबरता मतदानासाठी बाहेर पडावे व मतदान करावे. मतदारांची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सांगितले.

तसेच नागरिकांनी तीव्र उन्हापासून बचाव होण्यासाठी वाढत्या तापमानात फारवेळ कष्टाची कामे करणे टाळावे, कष्टाची कामे सकाळच्या वेळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमानात करावेत. उष्णता शोषून घेणारे कपडे (काळया किंवा भडक रंगाचे) वापरु नयेत, सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. जलसंजीवनीचा वापर करावा. भरपूर पाणी प्यावे. अधून मधून उन्हामध्ये काम करणे थांबवावे व सावलीत विश्रांती घ्यावी. अस्वस्थ वाटल्यास ताबडतोब उन्हात काम करणे थांबवावे व उपचार सुरु करावा. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरणे यांचा वापर करावा, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.

26 एप्रिलच्या मतदानाची प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात नागरिकांनी यावेळी ‘रेकॉर्ड ब्रेक ‘ मतदान करण्याचे प्रशासनाचे आवाहन
शुक्रवारला सुटी, निवारा, प्रथमोपचार, प्राथमिक सुविधा पूर्ण
लोकशाहीच्या पर्वातील सर्वात मोठी लोकसभा निवडणूक 26 एप्रिल रोजी होत आहे.सकाळी सात वाजता पासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत 26 एप्रिल रोजी मतदान करता येणार आहे. शासनाने 26 एप्रिलला सुटी घोषित केली असून मतदानाची सर्व तांत्रिक प्रक्रिया तसेच सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. आज या संदर्भात सर्व विभाग प्रमुखांचा आढावा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घेतला.

मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर येऊन मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. आपला मताधिकार बजावणे लोकशाहीमध्ये महत्त्वपूर्ण असून यावर्षी जिल्हावाशीयांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, मुख्य लेखा अधिकारी जनार्दन पक्वाने यांच्यासह अन्य सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

आजच्या बैठकीत प्रामुख्याने मतदान दिवसाच्या शेवटचे 72 तास, 48 तास व 24 तासापूर्वी आणि मतदानाच्या दिवशी करावयाच्या कारवाईबाबत आढावा घेण्यात आला. यामध्ये मतदान घडवून आणणाऱ्या मनुष्यबळाची उपलब्धता व प्रशिक्षण, मतदान केंद्रावरील पायाभूत सुविधा, कायदा आणि सुव्यवस्था, निवडणूक काळातील पैशांचा गैरवापर, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची मुबलक प्रमाणातील उपलब्धता, निवडणूक खर्चावरील सनियंत्रण, मतदारांची जनजागृती, पोलिंग एजंटच्या येणाऱ्या तक्रारी, माध्यमांसाठी निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या प्राधिकार पत्रांचे वाटप, मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाला नियमित द्यावयाची माहिती, मतदानाच्या वेळी नियमानुसार होणारे मतदान शंभर मीटरच्या आत मधील प्रचार बंदी, मोबाईल वापरावरील बंदी, याबाबतचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. प्रामुख्याने पुढील काही दिवसात कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भातही आढावा यावेळी घेण्यात आला. रात्रीच्या तपासणी वाढवण्यात याव्यात, फिरत्या पथकांकडून तपासणी कसून करण्यात यावी, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!