Maharashtra Gramin Bank : शेतकरी आणि मागासलेल्यांच्या विकासास प्रधान्य – अध्यक्ष महाराष्ट्र ग्रामीण बँक मिलिंद घारड

राष्ट्रीय महामार्गावरील टी पॉईंट येथे हाजी कॉम्प्लेक्स मध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे स्थलांतर

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
2 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

श्रीक्षेत्र माहूर| महाराष्ट्रातील शेतकरी आणि आर्थिक दुर्बल घटकात मोडत असलेल्या मागास प्रवर्गाच्या विकासासाठी बँक सदैव प्रयत्नशील असून त्यांच्या विकासास प्रथम प्राधान्य देण्यात येत असल्याने महाराष्ट्रात महाराष्ट्र ग्रामीण बँक ही नागरिकांच्या प्रथम पसंतीस उतरली असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड यांनी शाखा स्थलांतर कार्यक्रमाच्या वेळी केले.

शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे स्थलांतर राष्ट्रीय महामार्गावरील टि पॉइंट जवळ असलेल्या हाजी कॉम्प्लेक्स च्या भव्य इमारतीत करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड होते तर प्रमुख अतिथी म्हणून नरेंद्र खत्री क्षेत्रीय व्यवस्थापक नांदेड ,नायब तहसीलदार निलेश राऊत, पुरवठा निरीक्षक गजेंद्र मिरजगावे, अमोल अलकरी शाखा व्यवस्थापक, असिस्टंट जनरल मॅनेजर संतोष प्रभावती, माजी शाखा व्यवस्थापक दीपंकर पाटील वाई बाजार येथील शाखा व्यवस्थापक रोशन पेंदोर, श्री रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त चद्रकांत भोपी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सरफराज दोसानी, जागा मालक हाजी हाशम शकूर मकराणी, किशोर जगत, आरिफ शेठ सूर्रेय्या, किसन राठोड, इर्शाद मकरानी, कमलेश कुमरे, विपीन गरमले, प्रतीक्षा तमगाडगे, भाऊ पाटील, मनीष टोपरकवार, आफताब मकरानी, सुनील गोविंदवार, नामदेव कातले, तौफिक मकरानी, श्री सुर्वे पत्रकार, पंडित धुपे, जयकुमार अडकिने, इलियास बावाणी, यांचे सह बँकांचे कर्मचारी प्रतिष्ठित नागरिक ग्राहक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मिलिंद घारड यांनी पुढे बोलताना सांगितले की संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 750 शाखा आपली बँकिंग सेवा देत आहे 117 कोटी रुपयांचा टर्न ओव्हर बँकेचा असून ग्राहकांच्या विश्वासावर ही बँक चालत असून ग्राहकांना सुविधा देताना जलद प्रक्रियेचा अवलंब होत असल्याने नागरिकांचा बँकिंग व्यवहारात वेळ वाया जात नसल्याने महाराष्ट्र ग्रामीण बँक ग्राहकाच्या प्रथम पसंतीस उतरली आहे असे सांगितले. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून बँकेच्या नवीन वास्तू स्थलांतर कार्यक्रम आणि बँकेच्या भरभराटीसाठी शुभेच्छा दिल्या.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!