Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- Chicken gunnya : हिमायतनगर तालुकयातील जिरोना – गणेशवाडी गावाला डेंग्यूसह चिकन गुणियाच्या साथीने घेरले
- Om Namah Shivay : वाढोणाच्या श्री परमेश्वर मंदिरात श्रावण मासाची सुरुवात “ओम नमः शिवाय” नाम जाप यज्ञाने होणार
- Tree Plantation : वृक्षारोपण प्रेरणा मास उपक्रम शिक्षक सेना नांदेड शाखेच्या वतीने उत्साहात साजरा
- Sand thift Mahur : वाळू चोरी करून फरार झालेले चार ट्रॅक्टर जप्त; तहसीलदार मुगाजी काकडे यांनी केला होता गुन्हा दाखल
- Micro Finance : “आरबीआयचे नियम धाब्यावर – मायक्रो फायनान्सची बेलगाम वसुली”
- Gopu Mahamune : भाजपा माहुर शहराध्यक्ष पदी गोपु महामुने यांची निवड
- health sub-centre : लांजी येथे आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन !
- Dr. Hansraj Vaidya : ज्येष्ठांच्या “आषाढी लक्षवेधी मागणी महा मोर्चा तथा उघडा डोळे, पहा नीट ठिय्या अंदोलनास उत्तम प्रतिसाद
Author: NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
नांदेड। अधिस्विकृती पत्रिका पत्रकारांना मिळावी यासाठी यातील जाचक अटी कमी करुन ही प्रक्रिया पारदर्शी करण्यासाठी व सुटसुटीत करण्यासाठी शासनाच्या वतीने सर्व संबंधित वरिष्ठ अधिकार्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत व जास्तीत जास्त पत्रकारांना अधिस्विकृती पत्रिका मिळावी यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशा भावना अधिस्विकृती समितीचे लातूर विभागीय अध्यक्ष दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी तथा पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. तब्बल २५ वर्षानंतर नांदेड येथे लातूर विभागीय अधिस्विकृती समितीची पहिली बैठक काल नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीला अधिस्विकृती समितीचे सदस्य प्रल्हाद उमाटे, नरसिंह घोणे, अझरोद्दीन रमजान शेख, अमोल अंबेकर, लातूर विभागाच्या…
नांदेड। दिनांक २६-२७ जुलै २०२३ रोजी नांदेड शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घालून अनेकांचे संसार उध्वस्त केले आहेत. शासनदरबारी १५० मिमी पावसाची नोंद आहे. तेव्हा CITU संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियन च्या वतीने नांदेड शहरामध्ये सर्वेक्षण करून दि.२८ जुलै २०२३ पासून आजपर्यंत अखंड व सातत्याने पीडिताना सानुग्रह अनुदान व १४ जीवनावश्यक वस्तूची किट मिळावी म्हणून संघटना व पूरग्रस्त प्रयत्नशील आहेत. नांदेड शहरातील पूरग्रस्तांनी युनियन मार्फत केलेला पाठपुरावा आणि तारखेनिहाय केलेल्या आंदोलनाचा आढावा खाली देत आहोत. दि.२० सप्टेंबर रोज बुधवारी सर्व अर्ज केलेल्या पूरग्रस्तांनी अर्जाची आणि बँक पासबुकची झेरॉक्स घेऊन तहसील कार्यालय नांदेड येथे सकाळी ११:३० वाजता यावे.या आवाहना सह सामूहिक…
नांदेड/हिमायतनगर,अनिल मादसवार। मराठा समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे. या विषयी माझ्या मनात कुठली ही शंका नाही. म्हणून मी लोकसभा आणि राज्यसभेतील माझे सहकारी खासदारांची दिल्लीत एकत्र बैठक घेतली. या बैठकीत इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण दिले गेले पाहिजे यावर सर्वांचे एकमत झाले. सकल मराठा समाजास आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत मी आरक्षणाच्या लढाईत आपल्या सर्वांच्या सोबत असेल असे वक्तव्य खासदार हेमंत पाटील यांनी येथे केले. हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथे सुरु असलेल्या सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणास खासदार हेमंत पाटील यांनी मंगळवारी (दि.२६) भेट दिली. दरम्यान साखळी उपोषण स्थळी जाऊन मराठा समाजातील बांधवांच्या समस्या एैकुन घेत, मराठा…
नांदेड। नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असणाऱ्या एसटी कर्मचारी गणेश मंडळास गेल्या ३४ वर्षापासून श्रीची मूर्ती देणाऱ्या धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या निवासस्थानी असलेल्या संग्रहात क्रिकेट खेळणाऱ्या गणपतीपासून ते ट्रॅव्हल बॅग घेवून प्रवासाला जाणा-या आधुनिक रूपातील गणपतीची सुमारे ५०० हून जास्त भावमुद्राची विविध आकर्षक रूपे आहेत. समाजसेवेचा अविरत वसा घेतलेल्या दिलीप ठाकूर यांच्याकडील गणेशाच्या विविध मूर्तींचा हा संग्रह गेल्या तीन दशकांचा आकर्षक मूर्तींचा येथे खजिनाच आहे. दोन गणेश मूर्तींपासून सुरू झालेला हा भक्तिमय प्रवास आज पाचशेपेक्षा जास्त मूर्तीपर्यंत पोहोचला आहे. गेल्या ३४ वर्षांत त्यांनी देश-विदेशांतून वैशिष्ट्यपूर्ण अशा गणेशमूर्ती गोळा केल्या करुन पावित्र्य आणि प्रेरणा देणारा हा अप्रतिम खजिना दिलीपभाऊंनी जपला…
नांदेड। अध्ययन, अध्यापन आणि संशोधन या सोबतच नवीन युगातील नवीन आव्हानांना समर्थनपणे सामोरे जाणारे अभ्यासक्रम तयार करून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा नांदेड विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २६ व्या दीक्षान्त समारंमध्ये मा. राज्यपाल श्री. रमेश बैस यांनी केले. ते आज दि २५ सप्टेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा नांदेड विद्यापीठाच्या २६ व्या दीक्षान्त समारंभ प्रसंगी अभासी पद्धतीने बोलत होते. यावेळी दीक्षान्त मंचावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विशेष अतिथी श्री. बी. सरवनण, अधिष्ठाता डॉ. दिपक पानसकर, डॉ. डी. एम. खंदारे, डॉ. एम. के. पाटील, डॉ.…
नागपूर। ‘मेरी माटी मेरा देश ‘ उपक्रमातंर्गत सध्या अमृतकलश अभियान सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अमृत कलशाला काल माती आणि तांदूळ समर्पित केले. हे अभियान संपूर्ण शहरात सक्रियतेने राबविण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. देशातील शूरवीरांचा सन्मान करण्यासाठी, मातृभूमीचे वंदन करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव देशभर सुरु आहे. यामध्ये ‘मेरी माटी, मेरा देश ‘ अभियानाला नागपूर शहरात नागपूर महानगरपालिका तर ग्रामीण भागात जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींना सहभागी करणे हे देखील या उत्सवातील एक उपक्रम असून नागपूर शहरातील लोकप्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यामध्ये सहभागी झाले. स्थानिक स्तरांवर विविध नगरातून निघालेल्या कलश यात्रेचे त्यांनी स्वागत केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
नागपूर। नाग नदीला आलेल्या महापुरामुळे सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य तसेच अन्नधान्य भिजले असून घरातील चिखल काढण्यासाठी नागरिकांना मदत करण्यात येईल, तसेच नुकसानीसंदर्भात पंचनाम्याला दुपारी सुरुवात करून तत्काळ मदत देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर चार तासात जोरदार पावसामुळे अंबाझरी परिसरातील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे अन्नधान्यासह इतर साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी श्री. फडणवीस यांनी केली. डागा लेआउट, कार्पोरेशन कॉलनी, शंकर नगरसह इतर वस्त्यांना भेट देऊन येथील नागरिकांशी संवाद साधला. तसेच घरात चिखलामुळे झालेल्या नुकसानीचीही पाहणी केली. झालेल्या नुकसानीसंदर्भात नागरिकांनी आपल्या भावना…
“सर्वांसाठी घरे-२०२४” हे शासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना सन २०२४ पर्यंत स्वत:चे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न शासनाचा आहे. त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत. शासनामार्फत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल योजनाचा लाभ देण्यासाठी रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदीम आवास योजना तसेच विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व धनगर आवास योजना आहेत. तथापि, इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्याकरीता अशा प्रकारची कोणतीही योजना अस्तित्वात नव्हती त्यामुळे इतर मागास प्रवर्गातील घरकुलास पात्र लाभार्थी…
हिमायतनगर। शहरातील वनारसी गल्ली वार्ड क्रमांक 13 मध्ये असलेल्या सार्वजनिक 50 बाय 50 फूट असलेली प्राचीन काळातली बारव विहिरीवर अतिक्रमण करण्यात आले असून, तात्काळ संबंधित अतिक्रमण काढून पुरातन कालीन ठेवा जपावा अशी मागणी मुन्ना भाऊ शिंदे राजे प्रतिष्ठान हिमायतनगर तालुका अध्यक्ष यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे. हिमायतनगर शहराला पांडव कालीन वारसा लाभलेला आहे, आजवर हिमायतनगर शहरात अनेक ठिकाणी खोदकाम करताना देवी देवतांच्या मूर्त्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे मूर्त्यांचं शहर म्हणून हिमायतनगर वाढोणा शहराची ख्याती दूरदूर पसरलेली आहे. शहरात अनेक ठिकाणी पुरातन बारव विहिरी असुन, त्या सुरक्षित ठेवून इतिहास कालीन ठेवा जपून ठेवणे हे सर्वांचं कर्तव्य आहे.…
मुंबई। २०१४ सालापासून देशात लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवून मनमानी पद्धतीने व हुकुमशाही वृत्तीने भाजपचे सरकार काम करत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून अनैतिक व असंविधानिक मार्गाने राज्याची सत्ता मिळवण्याचे पाप भाजपाने केले आहे. पत्रकारांना ढाब्यावर चहापाणी देऊन भाजपला अनैतिक मार्गाने सत्ता मिळवण्याचे व चालवण्याचे पाप झाकता येणार नाही, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांचा अवमान करणा-या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा निषेध करून त्यांनी राज्यातील पत्रकारांची माफी मागावी अशी मागणी केली. ते पुढे म्हणाले की, जे भाजपच्या पोटात आहे तेच…