“पांढ-या सोन्याने” पंडीत दळवेंना मिळवुन दिले “पिवळे सोने”

केकतसिंदगी येथील हिंम्मत न हारणारे शेतकरी बनले "लखपती"

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
1 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

हंडरगुळी, उदगीर, लातूर, विठ्ठल पाटील| या वर्षी लातुर जिल्ह्यात अत्यअल्प पावसाळा झाला.त्यातच शासनाची कसलीच मदत नाही. तरी ही हिंम्मत न हारता वावरातील सगळी पिके तळहातावरच्या फोडा सारखी जपली. आणि त्यातील कापसाला ठिंबकने पाणी देऊन सव्वा एकरात खर्च वजा करता लातुर जिल्ह्यातील जळकोट तालुका मौजे.केकतसिंदगी येथील श्री.पंडीत दळवे यांनी 2,50,000 ₹. एवढा निव्वळ नफा मिळवला असुन,वरच्या निसर्गाच्या लहरीपणापुढे न हारता हिंम्मतीने कपाशीचे उत्पन्न घेतल्याने शेतकरी पंडीत दळवे यांचे जळकोट परिसरातुन कौतूक व अभिनंदन होत आहे.

दरम्यान “आले निसर्गाच्या मना तिथे कुणाचे चालेना” ही म्हन दळवे पंडीत या बहाद्दर शेतकरीराजाने खोटी केली असे म्हणने चुकीचे ठरणार नाही. नांदेड येथून कपाशी- च्या 2 बॅगा खरेदी करुन शेतात 3×4 अंतरावर लावण केली.व 2ते3वेळा फवारणी करुन ठिंबकने पाणी दिलो. व एका ट्रीला 150ते200बोंडे लागली होती.आणि या पिकांना जिवापाड जपलो.आणि सव्वा एकरात अडीच लक्ष रु.निव्वळ उत्पन्न मिळाले.

अशी माहिती पंडीत दळवे, केकतसिंदगी या शेतकरी मामांनी आमच्या जवळ बोलताना दिली.व तसेच “राजा”चा “बळी”जाण्याची वाट न पाहता सर्वच “बळीराजा”ला सरसकट पिकविमा, अग्रीम आदी मदत शासना तर्फे द्यावी आणि “राजा” ने हतबल होऊन आपला “बळी” देऊ नये.उलट धैर्याने संकटाचा मुकाबला “बळीराजा”ने करावा.असे ही पंडीत दळवे आमचे जवळ बोलताना म्हणाले.कपाशीतुन चांगले उत्पन्न मिळाल्याने “पांढ-या सोन्याने पंडीत दळवेंना मिळवुन दिले पिवळे सोने”असे म्हणने चुक ठरणार नाही..

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!