नांदेडलाईफस्टाईल

जिल्हाधिकारी सकारात्मक ; लिंबोटी धरणातून सुनेगाव तलावात पाणी सुटण्याची शक्यता (?)

लोहा| लोहा शहराला पुढील दोन महिने भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार अशी परिस्थितीत निर्माण होत असतानाच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शहरातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. ऊर्ध्व मानार धरणातून लोहा शहरासाठी सुनेगाव तलावात पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभाग व नगर परिषद प्रशासनाने पाणी मार्गाची ऑन दि स्पॉट पाहणी करावी व अहवाल सादर करण्याचा सूचना जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिल्या . त्यानंतर गुरुवारी पाहणी केली शहरातील भीषण पाणी टंचाई निवारणासाठी लिंबोटी धरणातून पाणी सुनेगाव तलावात सोडावे यासाठी प्रशासक व उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार व नगर परिषदेचे मुख्याधिकारी तहसीलदार विठ्ठल परळीकर यांचा पाठपुरावा सुरू आहे. बुधवारी (२७ मार्च) जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली त्यानंतर पाहणी करण्यात आली तो अहवाल सादर केला जाणार आहे.

लोहा शहराला सुनेगाव तलावातून पाणी पुरवठा होतो पण तळ्यात जेमतेम वीस दिवस पूरक इतकाच पाणी साठा उपलब्ध आहे.पुढील दोन महिने लोह्याला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. ऊर्ध्व मानार प्रकल्पातून ( लिंबोटी धरण) नदीपात्रा द्वारे सुनेगाव तलावात पाणी सोडण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत याच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांच्या दालनात बुधवारी(२७ मार्च) बैठक झाली .निवासी उपजिल्हाधिकारी वडजकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता(,दक्षिण) तहसीलदार व लोहा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विठ्ठल परळीकर, जिल्हा प्रशासन अधिकारी श्री इरलोड, नगर अभियंता शरद राहेरकर, ऊर्ध्व मानार प्रकल्पाचे उपअभियंता श्री फुलारी, यांची उपस्थिती होती.

लिंबोटी धरणात ९.२ दलघमी इतका जिवंत पाणीसाठा आहे. नगर परिषदेच्या दीड दलघमी पाणीसाठा राखीव आहे. कॅनॉल द्वारे नदीपात्रातून सुनेगाव तलावात पाणी सोडताना ऊर्ध्व मानार प्रकल्पाचे उपअभियंता व नगर अभियंता यांनी स्पॉट पाहणी करावी. कॅनॉल मधील गाळ तसेच जेथे गळती होणार तेथे डागडुजी नगर पालिका प्रशासनाने करावी. नदी पात्रात पाणी सोडताना त्या मार्गावर पाण्याचा अपव्यय तसेच संभाव्य पाणी चोरी या सगळ्या बाबीवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. दोन्ही कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी ऑन ड स्पॉट पाहणी करून अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा असे निर्देश बैठकीत देण्यात आले होते. त्यानुसार आज गुरुवारी रखरखत्या उन्हात कॅनॉल व पाणी मार्गाची पाहणी केली व तो अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर नदीपात्रात धरणातून पाणी सोडण्याचा अंतिम निर्णय होईल. उपविभागीय अधिकारी व नगर परिषदेच्या प्रशासक अरुणा संगेवार , तहसीलदार तथा मुख्याधिकारी विठ्ठल परळीकर यांचा पाठपुरावा सुरू आहे त्यामुळेच मंगळवारची पाणीपुरवठा बैठक झाली.

आणि शहराची पाणी समस्या सुटेल (?)
जर पाणी सोडण्याचा निर्णय झाला तर दीड दिवसात तेही पूर्ण संरक्षणात धरणातून नदीपात्रा द्वारे पाणी तलावात येईल व सहा सात दिवसात तलावात एक-दीड दलघमी पाणीसाठा जमा होईल जो की पावसाळ्या पर्यंत शहराला पुरेल शिवाय बोअरवेल कोरड्या पडल्यात त्यांनी पाणी येईल व शहराची पाणी समस्या सुटणार आहे.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!