
उस्माननगर। भोगाव ता.पालम जि.परभणी येथील स्वस्त धान्य परवानाधारक दुकानदार विश्वनाथ विठोबा ढगे यांनी शासनाची जाणून बुजून फसवणूक केली, असून त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्याकडे केली आहे.
अर्जदार विठ्ठल पांडूरंग काळम रा.उस्माननगर ता.कंधार यांनी मा.जिल्हाधिकारी परभणी यांच्या कडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली की , भोगाव ता.पालम जि.परभणी येथे शासना मार्फत चालविण्यात येणारे स्वस्त धान्य दुकानाचा परवाना हा विश्वनाथ विठोबा ढगे यांच्या नावाने मंजूर केला आहे.परवाना धारक ढगे विश्वनाथ हे कायद्याने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न करता जाणून बुजून गावातील लोकांसोबत हातमिळवणी करून शासनाची फसवणूक करीत आहेत.
मा.दिवानी न्यायालय , कनिष्ठ स्तर कंधार , ता.कंधार जि.नांदेड येथील प्रलंबित नियमित दिवाणी दावा क्रमांक आरसीएस २७/२०१५ मध्ये विश्वनाथ ढगे याने मा. न्यायालयात शपथेवर सांगितले आहे की , सावित्रीबाई दत्तराव दिवटे रा.भोगाव यांचे लग्न झाले आहे. तरीही तिला जाणुन बुजुन आज तारखे पर्येत तिला राशन पुरविण्यात येत आहे.सावित्रीबाई दिवटे हिचे भोगाव हे गाव आहे.
परवाना धारक ढगे विश्वनाथ यांना सावित्रीबाई दिवटे यांचे लग्न झालेले आहे. हे माहीत असूनही तिचे नाव जाणुन बुजुन कमी करण्याबाबत आज तारखे पर्येत कोणतीही कार्यवाही न करता सावित्रीबाई दत्तराव दिवटे हिच्याशी व गावातील लोकांशी हातमिळवणी करून राशन पुरविण्यात येत आहे.तरी विश्वनाथ ढगे व सावित्रीबाई दिवटे यांनी शासनाची फसवणूक केली आहे. याची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करुन फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी दिलेल्या निवेदनात विठ्ठल पांडूरंग पाटील काळम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
