नवमतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करा – क्षेत्रीय व्यवस्थापक निती सरकार

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
4 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नांदेड, अनिल मादसवार| लोकशाहीत मतदान व मतदार या दोन्ही गोष्टींना खूप महत्व आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत मतदारांनी मतदानाचे कर्तव्य पालन करण्यासाठी कटिबद्ध झाले पाहिजे. याचबरोबर निवडणूक प्रक्रियेत नवमतदारांनी इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय क्षेत्रीय व्यवस्थापक निती सरकार यांनी केले.

डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, राज्य निवडणूक दूत डॉ. सान्वी जेठवाणी, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, मतदार नोंदणी अधिकारी विकास माने, तहसिलदार संजय वारकड, भटक्या विमुक्त जाती जमातीचे निवडणूक प्रतिनिधी देविदास हादवे आदींची उपस्थिती होती.

मतदार नोंदणी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रभावीपणे जनजागृती करण्यात आली. यामुळे नवमतदाराच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून याबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना भारत निवडणूक आयोगाकडून उत्कृष्ट मतदार जागृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही आपल्या सर्वासाठी गौरवास्पद बाब असल्याचे निती सरकार यांनी सांगितले.

पहिले मत अविस्मरणीय करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जिल्ह्यातील तृतीयपंथी, भटके विमुक्त, गारुडी, कुडमुडे जोशी व इतर समाजातील लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विशेष प्रत्यत्न करण्यात आले. त्यांना आधार, रेशन कार्ड व इतर शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासमवेत निवडणूक ओळखपत्र देवून मतदानाचा अधिकार बहाल केला. याबाबत नुकताच भारत निवडणूक आयोगाकडून नांदेड जिल्ह्याला मतदार जागृती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे जिल्ह्यातील नवमतदाराकडून अपेक्षा वाढल्या असून नवमतदारांनी आपले पहिले मत जागरुक राहून अविस्मरणीय बनवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

मतदार व मतदान प्रक्रियेत महिलांचे योगदान मोठे असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नमूद केले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना भारत निवडणूक आयोगाकडून पुरस्कार मिळाल्याबाबत भटक्या विमुक्त जाती जमातीचे नागरिक व पथनाट्याचे विद्यार्थी यांच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. मतदार जागृती दिवस हा लोकशाहीतील मोठा दिवस असून यात मतदार जागृतीचे कार्य खूप मोठे आहे. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून मतदार जागरुक असणे आवश्यक आहे. नवमतदारानी आपले नाव मतदान यादीत नोंदवून मतदान प्रक्रियेत आपला व इतरांच्या सहभागासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्य निवडणूक दूत डॉ. सान्वी जेठवाणी यांनी केले.

भटक्या विमुक्तांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी विशेष प्रयत्न केले असून त्यांनी जिल्ह्यातील भटक्या विमुक्तांना आधार, रेशन, मतदान कार्ड देण्यासोबत 3 हजार मतदारांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच त्यांच्या मार्गदर्शनामुळे जिल्ह्यातील 500 ते 700 भटक्या विमुक्त जातीच्या लोकांना जात प्रमाणपत्र मिळाले असून इतरही सोयी-सुविधा प्राप्त झाल्याची माहिती भटक्या विमुक्त जाती जमातीचे निवडणूक प्रतिनिधी देविदास हदवे यांनी यावेळी दिली.

भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखाली होणाऱ्या निवडणूकाबाबत माहिती अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर यांनी दिली. तसेच लोकशाहीत एका मताचे महत्व काय असते यांचे महत्व विशद करुन नवमतदारांनी नैतिकतेच्या आधारावर आपले मतदान करावे, असेही त्यांनी युवा मतदारांना सांगितले.

यावेळी भोकर येथील कुशल देशमुख यांच्या पथनाटय संचाने मतदानाचे महत्व, मतदानाचे अधिकार, प्रक्रिया याबाबत पथनाट्याचे सादरीकरण केले. तसेच यावेळी जिल्हा निवडणूक दूत म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू कु. सृष्टी जोगदंड, भाग्यश्री जाधव, अभिनेता कपिल गुडसुरकर यांना मान्यवरांच्या हस्ते नेमणूक पत्र देण्यात आले. या कार्यक्रमात 2023 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेले महाविद्यालय, निवडणूक साक्षरता मंडळ, संपर्क अधिकारी, विद्यार्थी, बिएलओ, नवमतदार, तहसिल कार्यालयातील ऑपरेटर इत्यादीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले. शेवटी आभार तहसिलदार संजय वारकड यांनी मानले.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!