नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील ८५.६० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाले १७१२ कोटी रुपये

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
3 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

मुंबई| शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये थेट जमा करण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘नमो शेतकरी सन्मान’ योजनेचा शुभारंभ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी (जि. अहमदनगर) येथे करण्यात आला. राज्य सरकारच्या या योजनेमुळे केंद्र आणि राज्याचे मिळून शेतकऱ्यांना आता दरवर्षी 12 हजार रुपये मिळतील.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी एका क्लिकद्वारे राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 1712.02 कोटी रुपये पाठवून योजनेचा शुभारंभ केला. दरम्यान, हा आपल्या जीवनातील ऐतिहासिक व अविस्मरणीय दिवस असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत नमूद केले आहे.

उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2023 24 चा अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये या योजनेचा शुभारंभ करण्याचे घोषणा केली होती. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या योजनेला गती दिली. किरकोळ तांत्रिक कारणांमुळे राज्यातील 12 लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेपासून वंचित होते. या शेतकऱ्यांसाठी त्यांनी राज्यभरात विशेष मोहिम घेतली आणि 6 लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत वाढविले. या शेतकऱ्यांना आता नमो किसान सन्मान योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहे.

नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळालेले सर्वाधिक शेतकरी अहमदनगर जिल्ह्यातील आहेत नगर जिल्ह्यातील 5 लाख 17 हजार 611 शेतकऱ्यांना 103 कोटी रुपये वितरित करण्यात आले त्या खालोखाल सोलापूर जिल्ह्यातील 4 लाख 54 हजार 40 शेतकऱ्यांना 90 कोटी 81 लाख, कोल्हापूर जिल्ह्यातील 4 लाख 6 हजार 240 शेतकऱ्यांना 81 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

‘नमो शेतकरी सन्मान योजने’तून खात्यावर पैसे जमा झाल्याचे संदेश अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर प्राप्त झाले. त्यानंतर शेतकऱ्यांना आनंद झाला. खात्यावर 2 हजार रुपये प्राप्त झाल्याचा संदेश शेतकऱ्यांना समाधान देऊन गेला. शेतकऱ्यांनी हे संदेश इतरांना दाखवून आनंद व्यक्त केला. दुष्काळसदृश परिस्थिती असताना शेतकऱ्यांना यामुळे आधार मिळत आहे.

या योजनेतून जिल्हा निहाय वितरित करण्यात आलेली रक्कम खालील प्रमाणे-
अहमदनगर- 5,17,611 शेतकऱ्यांना 103.52 कोटी
अकोला -1,87,816 शेतकऱ्यांना 37.56 कोटी
अमरावती 2,65,916 शेतकऱ्यांना 53.18 कोटी
संभाजीनगर (औरंगाबाद) 3,26,840 शेतकऱ्यांना 65.37 कोटी
बीड 3,89,527 शेतकऱ्यांना 77.91 कोटी
भंडारा 186031 शेतकऱ्यांना 37.21 कोटी
बुलढाणा 331894 शेतकऱ्यांना 66.38 कोटी
चंद्रपूर 216613 शेतकऱ्यांना 43.32 कोटी
धुळे 142441 शेतकऱ्यांना 28.40 कोटी
गडचिरोली 129639 शेतकऱ्यांना 25.93 कोटी
गोंदिया 212418 शेतकऱ्यांना 42.48 कोटी
हिंगोली 180576 शेतकऱ्यांना 36.12 कोटी
जळगाव 379549 शेतकऱ्यांना 75.91 कोटी
जालना 289771 शेतकऱ्यांना 57.95 कोटी
कोल्हापूर 406240 शेतकऱ्यांना 81.25 कोटी
लातूर 267300 शेतकऱ्यांना 53.46 कोटी
नागपूर 150414 शेतकऱ्यांना 30.08 कोटी

नांदेड 377415 शेतकऱ्यांना 75.48 कोटी
नंदुरबार 96585 शेतकऱ्यांना 29.32 कोटी
नाशिक 385347 शेतकऱ्यांना 77.07 कोटी
धाराशिव (उस्मानाबाद)- 211409 शेतकऱ्यांना 42.28 कोटी
पालघर 80336 शेतकऱ्यांना 16.07 कोटी
परभणी 267107 शेतकऱ्यांना 53.42 कोटी
पुणे 389842 शेतकऱ्यांना 77.97 कोटी
रायगड 98264 शेतकऱ्यांना 19.65 कोटी
रत्नागिरी 127600 शेतकऱ्यांना 25.52 कोटी
सांगली 367179 शेतकऱ्यांना 73.44 कोटी
सातारा 393334 शेतकऱ्यांना 78.67 कोटी
सिंधुदुर्ग 108103 शेतकऱ्यांना 21.62 कोटी
सोलापूर 454040 शेतकऱ्यांना 90.81 कोटी
ठाणे 68367 शेतकऱ्यांना 13.67 कोटी
वर्धा 123376 शेतकऱ्यांना 24.68 कोटी
वाशीम 154052 शेतकऱ्यांना 30.81कोटी
यवतमाळ 277130 शेतकऱ्यांना 55.43कोटी

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!