Demand for compensation : बियाणे उगवले नसल्याने नुकसान भरपाई देण्याची मागणी

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
2 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

श्रीक्षेत्र माहूर,इलियास बावानी| माहूर तालुक्यातील मौजे गुंडवळ येथील शेतकऱ्यांनी शेतात पेरलेले करिश्मा 27 के जी व्ही आय जी ओ टी कंपनीच्या दोन बॅग व सोया 9305 टी/वन बुस्टर 30 के जि बुस्टर व्ही ट कंपनीच्या दोन बॅग ची उगवण शक्ती झाली नसल्याने कंपनीने माझे अतोनात नुकसान केल्या प्रकरणी या कंपनीवर कायदेशीर कारवाई करूननुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार मुगाची काकडे यांच्याकडे प्रदीप जमदाडे यांनी केली आहे

मौजे गुंडवळ येथील रेखाबाई भीमराव जमदाडे वर्षे 60 यांनी निवेदनात नमूद केल्याप्रमाणे मी माझी वडिलोपार्जीत शेती करून माझे व माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असते. मी अनुसूचित जाती मधील बौद्ध समाजाची एक विधवा शेतकरी आहे.माझे शेत मौजे गुंडवळ ता. माहूर येथे असून शेत सर्वे न. 66 व 67 मध्ये मी वर नमूद केलेल्या करिश्मा 27 केजी व्हीआय जिओ टी कंपनीच्या दोन बॅग व सोया 9305 टी वन बुस्टर 30 के जी बुस्टर व्हीट कंपनीच्या दोन बॅग ची पेरणी दि. 25/06/2025 रोजी केली असून मला प्रतीबॅगला रु.6000/- खर्च आलेला आहे. या बियाण्याची उगवणशक्ती 20 टक्के झाली असून माझे कधीही न भरून निघणारे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे व मला दुबार पेरणी करण्याची पाळी येण्याचे संकट आले आहे.

तेव्हा मेहरबान साहेबांनी वरील दिलेल्या कंपनीवर तात्काळ कारवाई करून मी करिश्मा 27 के जी व्ही आय जी ओ टी कंपनीच्या दोन बॅग व सोया 9305 टी वन बुस्टर 30 कें जीं बुस्टर व्हिट कंपनीच्या दोन बॅग ची उगवण शक्ती झाली नसल्याने कंपनीने माझे अतोनात नुकसान केल्या प्रकरणी या कंपनीवर कायदेशीर कारवाई करून मला न्याय द्यावा व मला माझी झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी ही नम्र विनंती. अशी मागणी केल्याने तालुक्यात विक्री झालेल्या बोगस बियाण्यांची उगवणच झाली नसल्याने सदरील बियाणे अनेक शेतकऱ्यांनी घेतल्याने त्यांचीही तीच अवस्था झाल्याची शक्यता नाकारता येत असल्याने कृषी अधिकाऱ्यांनी तात्काळ तालुक्यातील शेत शिवारात केलेल्या बियाण्यांची तपासणी करावी अशी मागणी होत आहे

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!