नांदेडसोशल वर्क

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते किनवट येथे “विकसीत भारत संकल्प यात्रा” मोहिमेचा शुभारंभ

नांदेड| सन 2047 मध्ये भारतीय स्वातंत्र्याची शंभर वर्षे साजरा करतांना आपला भारत हा विकसीत देशांच्या यादीत असेल, हे ध्येय दृष्टीपथात ठेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी “विकसीत भारत संकल्प यात्रा” ही देशव्यापी मोहिम हाती घेतली आहे. जनजाती गौरव दिनाचे औचित्य साधून या मोहिमेचा शुभारंभ 15 नोव्हेंबर 2023 रोजी होत आहे.

नांदेड जिल्ह्यातील आदिवासी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनवट येथील या मोहिमेचा शुभारंभ राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. किनवट येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे सकाळी 10 वा. होणाऱ्या या समारंभास सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी जे लाभार्थी पात्र आहेत मात्र त्यांच्यापर्यंत योजना पोहचू शकल्या नाहीत त्या लाभार्थ्यांना विविध विकास योजनांचा लाभ देऊन त्यांना विकासाच्या प्रवाहात घेण्याचा प्रमुख उद्देश या मोहिमेअंतर्गत ठेवण्यात आला आहे. 15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत ही मोहिम राबविली जाईल. या यात्रेच्या माध्यमातून आरोग्य, कृषी, आवास, आयुष्यमान भारत, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, पीएम विश्वकर्मा, जन धन योजना, अटल पेन्शन योजना, बीमा योजना, पीएम पोषण अभियान, दिनदयाल अंत्योदय योजना आदीचा समावेश आहे. तसेच आदीवासी विभागासाठी विशेष योजना, स्कॉलरशिप योजना, वंदन योजना, उज्वला योजना, उजाला योजना अशा विविध विभागाच्या योजनाचा यात समावेश असणार आहे. या योजनाचा लाभ, अर्ज भरुन घेणे याबाबीचा यात समावेश असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!