
नांदेड| “विकसित कृषि संकल्प अभियान” अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती पद्धतींचा प्रभावी वापर करून उत्पादनवाढीच्या संधींवर केंद्रित सत्र आयोजित करण्यात आले. विशेषतः ऊस शेतीच्या सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब आणि उत्पादनवाढीसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन यावर भर देण्यात आला. आज धर्माबाद तालुक्यातील शेळगाव, माष्टी, मोकली व देगलूर तालुक्यातील शेळगाव, कोटेकल्लुर, तमलुर या गावी अभियान नुकतेच संपन्न झाले.

प्रमुख तज्ज्ञ आणि अधिकारी उपस्थित
या महत्वपूर्ण कार्यक्रमात राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. शिरगुरे आणि शास्त्रज्ञ श्री. राहुल sab यांनी शेतीत डाळिंब उत्पादन करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करावा यावर मार्गदर्शन केले. ऊस संशोधन शास्त्रज्ञ डॉ. थोरात आणि डॉ. बोरसे यांनी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी उन्नत तंत्रज्ञान, सुधारित वाण आणि काटेकोर व्यवस्थापन यावर चर्चा केली.

संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. कपिल इंगळे, डॉ. माधुरी रेवणवार आणि डॉ. प्रियंका खोले यांनी हवामान अनुकूल शेती, पीक विविधता आणि जैविक शेतीच्या संधी यावर सखोल मार्गदर्शन केले. प्रभुदास उडतेवार, बालाजी चंदापुरे, प्रशांत शिवपणोर आणि संतोष लोखंडे यांचीही विशेष उपस्थिती लाभली, ज्यांनी शासकीय योजनांचा प्रभावी लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
उत्तम उत्पादनासाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञान
· सुधारित लागवड तंत्रज्ञान – हवामान बदलांचा परिणाम कमी करण्यासाठी योग्य पीक योजना
· मृदा आरोग्य आणि जैविक शेती – जमिनीच्या सुपीकतेसाठी संतुलित खत व्यवस्थापन
· जलसंधारण आणि आधुनिक पाणी व्यवस्थापन – ड्रिप सिंचन, सूक्ष्म सिंचन आणि सेंद्रिय उपाय
· पीक संरक्षण उपाय – नैसर्गिक उपायांचा प्रभावी उपयोग
कृषी व्यवसाय आणि उत्पादनवाढीचा मार्ग
· सेंद्रिय शेती आणि जैविक उत्पादनांचा वापर – निर्यात व मूल्यवर्धित उत्पादनास चालना
· डिजिटल मार्केटिंग आणि आधुनिक विक्री व्यवस्था – शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी जोडण्याचा मार्ग
· सेंद्रिय खत निर्मिती आणि जैविक प्रक्रिया उद्योग – गट शेतीद्वारे अधिक नफा मिळवण्याची संधी
शेतीत नवी क्रांती – शेतकऱ्यांसाठी संधी
शेतकऱ्यांनी उत्तम तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनवाढीसाठी योग्य नियोजन करण्याचा संकल्प केला आहे. या अभियानाद्वारे हजारो शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत असून ते शेतीत नव्या संधी शोधत आहेत. शेतीच्या प्रगतीसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन, गट शेती आणि शासकीय योजनांचा प्रभावी उपयोग करण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
