
माळाकोळी| कंधार येथील साधु महाराज संस्थानच्या दिंडीची अनेक वर्षांची परंपरा आहे. मराठवाड्यातील महत्वाची असलेल्या साधु महाराज दिंडीच्या कंधार ते पंढरपुर प्रवासात अनेक अडचणी निर्माण होतात. यासाठी दिंडीला पोलीस संरक्षण व आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करणार असुन पुढील वर्षापर्यंत या सुविधा उपलब्ध करुन देऊ असे प्रतिपादन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले ते माळेगाव येथे साधु महाराज दिंडीच्या स्वागत कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

या प्रसंगी ह.भ.प. एकनाथ महाराज, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज, जना माय, किर्ती माय, भास्कर महाराज, चालीकवार गुरूजी, बनवसकर महाराज, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर, सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर, किरण सावकार वटमवार, केशवराव मुकदम, दत्ता वाले, मनोहर पाटील भोसीकर, स्वप्नील पाटील लुंगारे, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव पाटील सावळे, लोहा पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे, किशनराव डफडे, नरेंद्र गायकवाड, रोहित पाटील, चंद्रमुनी मस्के, परमेश्वर मुरकुटे, हरीभाऊ चव्हाण, वीरभद्र राजुरे, गणपत तिडके, बाळू बाबर, माऊली बाबर, बालाजी पाटील कदम, भगवान राठोड, राजकुमार कोकाटे, प्रभाकर सुरनर, बंडू पाटील वडजे, भानुदास पाटील मस्कीकर, पिराजी पोले, भिमराव नाईक, मारोती पाटील बोरगांवकर, बाळासाहेब गरजे, कांता पाटील बोडके, अंबादास जहागीरदार, सकाराम तिडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक,चेतन केंद्रे, बाबुराव कांबळे माळेगांव येथील सर्व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, से.स.सो.चेअरमन राधाकिशन फुगनर आदी उपस्थित होते. आभार हणमंत धुळगंडे यांनी मानले.

माळेगाव येथे मागील अनेक वर्षांपासून आमदार प्रताप पाटील चिखलीकर कुटुंबीयांकडून दिंडीचे स्वागत केले जाते, आमदार चिखलीकर यांचे वडील शांतीदुत गोविंदराव पाटील चिखलीकर यांच्यापासून जिल्हा सीमेवर साधु महाराज दिंडीच्या स्वागताची व अन्नदानाची परंपरा आहे, ती चिखलीकर कुटुंबीयांकडून आजही सुरु आहे, शिवाय दिंडीच्या अडीअडचणींना आमदार प्रताप पाटील चिखलीकर नेहमी धाऊन जातात, कंधार ते पंढरपुर प्रवासात दिंडीला येणाऱ्या अडचणीत आमदार प्रताप पाटील चिखलीकर मदतीला कायम असतात अशी माहिती भास्कर साधु महाराज यांनी यावेळी बोलताना दिली. यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर कुटुंबीयांकडून दिंडीतील भाविकांचा यथोचित सत्कार करण्यात आला, अन्नदान करण्यात आले, स्वतः आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिंडीतील भाविकांसह पावले खेळत, भजन करत जिल्हा सीमेपर्यंत दिंडीला निरोप देण्यात आला.
जातीयवाद संपला पाहिजे !
मी अठरा निवडणुका लढविल्या मात्र कधीही जातीयवाद झाला नाही या विधानसभा निवडणुकीत जातीयवाद मोठ्या प्रमाणात झाला, माझी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे हा जातीयवाद संपला पाहिजे, माणुसकी हीच नविन जात व्हावी यात एकमेकांना मदत व्हावी ही अपेक्षा यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली.
