नांदेडमहाराष्ट्र

विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेद्वारे पात्र लाभार्थ्यांपर्यंत अधिकाधिक योजना पोहोचवा – जील्हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड, अनिल मादसवार| शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. सुरुवातीला अनुसूचित जमाती असलेल्या 110 जिल्ह्यांना ही यात्रा भेट देणार आहे. यात किनवट तालुक्याचा समावेश आहे. किनवट येथे 15 नोंव्हेंबर रोजी या यात्रेच्या रथाचे स्वागत व मोहीमेचा शुभारंभ होणार आहे. या मोहीमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विभाग प्रमुखांनी त्या-त्या विभागाच्या योजना वंचित लाभार्थ्यांपर्यत पोहचविण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्य मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कार्तीकेएन एस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, आत्मा प्रकल्प उपसंचालक माधुरी सोनवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले, जिल्हा सूचना-विज्ञान अधिकारी प्रफुल्ल कर्णेवार आदीची तर सर्व तालुक्याचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती होती.

जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा मोहीमेचा पहिला टप्पा 15 ते 23 नोंव्हेंबर या कालावधीत किनवट येथे प्रस्तावित आहे. या कालावधीत ही यात्रा मोहीम 16 ग्रामपंचायतीना भेट देणार आहे. या मोहीमेच्या अंमलबजावणीसाठी नोडल अधिकारी नेमणूक, ग्रामपंचायतीचा रस्त्याचा नकाशा, कार्यक्रमाच्या दिवशी नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करणे, कार्यक्रमाच्या दिवशी कार्यक्रमाचे फोटो व व्हीडीओ अपलोड करणे याबाबत माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी किनवट तालुक्याच्या मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी यांना सांगितली. तसेच या मोहीमेसाठी तालुका व ग्रामपंचायत स्तरावर समित्या गठीत करुन प्रत्येक कामासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करावेत. स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी, लाभार्थी, व्यापक जनसहभाग व जिल्हा समन्वयक यांच्या सहकार्याने ही मोहिम यशस्वी राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित विभागाला दिल्या.

विकसित भारत संकल्प यात्रा या मोहीमेचा शुभारंभ 15 नोव्हेंबर रोजी किनवट येथे होणार आहे. त्या अनुषंगाने तालुका व ग्रामपंचायत स्तरावर समित्या तात्काळ गठीत कराव्यात. या यात्रेच्या माध्यमातून आपल्याला वंचित लाभार्थ्यांपर्यत पोहोचायचे आहे. त्यासाठी संबंधित विभागाने लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्याच्या कामावर प्राधान्याने भर द्यावा, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी स्पष्ट केले. या मोहीमेत आरोग्य, कृषी, आवास, आयुष्यमान भारत, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, पीएम विश्वकर्मा, जन धन योजना, अटल पेन्शन योजना, बीमा योजना, पीएम पोषण अभियान, दिनदयाल अंत्योदय योजना आदीचा समावेश आहे. तसेच आदीवासी विभागासाठी विशेष योजना, स्कॉलरशिप योजना, वंदन योजना, उज्वला योजना, उजाला योजना अशा विविध विभागाच्या योजनाचा यात समावेश असणार आहे. या योजनाचा लाभ, अर्ज भरुन घेणे याबाबीचा यात समावेश असणार आहे. या मोहीमेच्या अनुषंगाने केलेली कार्यवाही तसेच फोटो, व्हीडीओ संबंधित अधिकाऱ्यांनी पोर्टलवर अपलोड करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!