विहिंप बजरंग दलातर्फे नांदेड जिल्ह्यात भव्य शौर्य यात्रेचे आयोजन

नांदेड। विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला श्रीकृष्ण जन्माष्टमीला साठ (६०) वर्षे पूर्ण होत आहे हे वर्ष विश्व हिंदू परिषदेचे षष्ठीपूर्ती वर्ष आहे. या निमित्ताने वर्षभर देशभरात विश्व हिंदू परिषदेने आपल्या सर्व कार्य विभागाच्या सहभागाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या षष्ठीपूर्ती वर्षानिमित्ताने बजरंग दलाच्या वतीने पूर्ण देशभरात हिंदू समाजात शौर्य संस्काराचे व्यापक जनजागरण व्हावे. तसेच हिंदू साम्राज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी साम्राज्याला यावर्षी 350 वर्षे पूर्ण होत आहेत.
हिंदूपदपातशाही रूपाने नवीन सृष्टी निर्माण करणाऱ्या महाराजांच्या पराक्रमाचे स्मरण सर्व हिंदू समाजाने करावे राष्ट्र जागरण कार्यातील महाराजांच्या योगदानाबाबत समाजातील महाराजांविषयीचा कृतज्ञतेचा भाव वृद्धिंगत व्हावा यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या पुढाकाराने सकल हिंदू समाजाच्या सहभागाने देवगिरी प्रांतामध्ये भव्य शौर्य जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
शिवछत्रपतींचा पराक्रम ,मराठा सरदारांचा तसेच मावळ्यांचा पराक्रम स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांचा आत्मबलिदानाचा पराक्रमी लढा गेल्या ७५ वर्षात देशाच्या स्वातंत्र्य रक्षणासाठी होतात्म्य पत्करणाऱ्या वीर सैनिकांचा पराक्रम अशा सर्वव्यापी तेजस्वी शौर्याचे दर्शन विविध ठिकाणच्या सभेतून या रथयात्राद्वारे समाजासमोर ठेवले जाईल रथयात्रेद्वारे हिंदूंचा एकत्वाचा भाव जागृत व्हावा आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचे स्मरण करून देव देश धर्मासाठी कटिबद्ध होण्याचा संकल्प तरुणांनी करावा स्वाभिमानी बलशाली धर्माभिमानी सुसंस्कारित हिंदू युवक घडावा तसेच धर्मांतरण , गौहत्या आदी बाबींवर आला बसावा.
असा या रथयात्रेच्या मुख्य उद्देश्य आहे राष्ट्र व धर्म जनजागरा धनासाठी सर्व हिंदू समाजाने यात्रांमध्ये सहभागी होऊन या राष्ट्रीय कार्यात आपले बहुमोल योगदान द्यावे असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यात शौर्य जागरण यात्रेची सुरुवात नांदेड शहरातून पाच ऑक्टोबर रोजी गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक चौफाळा ते स्वामी समर्थ मंदिर सोमेश कॉलनी येथे होणार आहे तसेच जिल्हाभरात सर्व तालुक्यात मंडळ स्तरावर ही यात्रा निघणार असून सर्व धर्मप्रेमी नागरिकांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
